
Washim News : मानोरा तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) व शनिवारी (ता. ९) झालेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांच्या काठावरील शेतातील उभे पिके वाहून गेली. जमीन खरडून शेतीचे नुकसान झाले असून बोरव्हा धरण भरल्याने सांडव्यातून होणाऱ्या विसर्गमुळे शेतीचे नुकसान झाले.
काही शेतात दगडांचा खच पडला आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन तत्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रदीर्घ विश्रांतीनंतर मानोरा तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी पावसाने हजेरी लावली. दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील अरुणावती, धावंडा, अडाणसह नाल्यांना पूर येऊन दुथडी भरून वाहिले. नदी व नाल्यांच्या काठच्या शेतीत पुराचे पाणी शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेकांची शेती खरडून गेली. शेतांमध्ये दगड, धोंडे आले.
पावसाने नुकसान झालेल्या भागामध्ये बोरव्हा, कार्ली, धामणी, सावरगाव फाॅरेस्ट, कारखेडा, वरोली, सेवादास नगर, पोहरादेवी, उमरी बुद्रूक, उमरी खुर्द गावांचा समावेश असून बोरव्हा येथील धरणाच्या सांडव्यातील पाणी शेतात शिरल्याने भारत बन्सी चव्हाण, तुळशीराम दिवानसिंग जाधव, प्रतिभा संतोष राठोड, भारती तुकाराम राठोड यांच्या शेतातील पिके वाहून गेली.
शेतात दगडांचा खच शिल्लक आहे. हीच स्थिती सावरगाव फाॅरेस्ट येथील २० शेतकऱ्यांच्या शेतांची झाली आहे. महसूल आणि कृषी विभाग यांनी संयुक्त पीक पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.