Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : अहिल्यानगर जिल्ह्यात या वर्षी अवकाळी, वादळ आणि अतिवृष्टीमुळे ७४४ गावांमधील १६ हजार १७७ शेतकरी बाधित झाले आहेत. ५ हजार ३२७. ९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात या वर्षी अवकाळी, वादळ आणि अतिवृष्टीमुळे ७४४ गावांमधील १६ हजार १७७ शेतकरी बाधित झाले आहेत. ५ हजार ३२७. ९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक फटका नगर तालुक्यातील ६७ गावांमधील २ हजार २६३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेवगाव तालुक्यात सर्वात कमी नुकसान ५ गावांमधील ४६ शेतकऱ्यांचे झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात या वर्षी एप्रिल महिन्यापासून अनेक वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी पिके, तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मे महिन्यात तर यंदा इतिहासात पहिल्यांदाच मोठा पाऊस झाला. मे महिन्यात अवकाळी पावसाने दक्षिण भागातील तालुक्यात तडाखा दिला.

नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे या तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा फटका बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरे, फळबागा आणि उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. नगर तालुक्यात २७ मे रोजी वाळकी, केडगाव, अरणगाव या महसूल मंडलात एकाच दिवशी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.

Rain Crop Damage
Paddy Crop Damage : चंद्रपुरात धान पिकावर पुराचे संकट

या अतिवृष्टीमुळे या भागातील नद्यांना महापूर आले. नदीकाठावरील जमिनीचा मातीचा थर वाहून गेला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली. रस्ते, शाळा, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यंदा जिल्हाभर मे महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. कांद्यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

जिल्हाभराचा विचार केला तर ७४४ गावांमधील १६ हजार १७७ शेतकरी बाधित झाले आहेत. ५ हजार ३२७.९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक फटका नगर तालुक्यातील ६७ गावांमधील २ हजार २६३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Rain Crop Damage
Crop Damage : पावसामुळे विदर्भात २८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

अहिल्यानगर तालुक्याला यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील जवळपास ८० गावांत तीन हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वाळकी, अकोळनेर, भोरवाडी, खडकी आदी नदीकाठच्या गावांना अधिक फटका बसला असल्याचे स्पष्ट झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

नुकसान भरपाई मिळेना

अहिल्यानगर तालुक्यातील अनेक गावांना मे महिन्यातील अवकाळी पावसाने फटका बसला. शेतपिके, शेती, जनावरे वाहून गेली. नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने ती कधी मिळणार असा प्रश्न भरपाई मिळाली नसलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com