Heavy Rain: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार; आंबा हंगाम संपुष्टात

Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी व कणकवली तालुक्यांत बुधवारी (ता. १४) मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा हंगाम संपुष्टात आला असून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने शनिवारपर्यंत 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवलीला बुधवारी (ता. १४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर सर्वत्र पाऊस झाला. दरम्यान खांबाळे येथे घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडांवर वीज पडली. या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम सपुंष्टात आला असून हवामान विभागाने जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. १७) ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

सिंधुदुर्गात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील अनेक गावांमध्ये चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागांत प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दीड-दोनपासून कणकवली तालुक्यातील अनेक भागांत विजांचा कडकडाट सुरू झाला.

Crop Damage
Pre-Monsoon Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान

कणकवली शहरात दोनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या. अर्धा तास शहरात जोरदार पाऊस सुरू होता. त्यानंतर हुमरठ, कोंडये, करूळ, कनेडी, हरकुळ, फोंडा घोणसरी या परिसराला मॉन्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी, एडगाव, खांबाळे, आर्चिणे, नावळे, सडुरे, कुर्ली, करूळ या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.

खांबाळे येथील स्नेहलता पवार यांच्या घरानजीकच्या नारळाच्या झाडावर वीज पडली. यात नारळाचे नुकसान झाले. सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम संपुष्टात आला आहे. केवळ आठ ते दहा दिवसांचा हंगाम राहिला आहे. आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Pre Monsoon Rain: मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर शेतीला मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका

राज्यात गुरुवारी वाशीम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी शेतात वाळत ठेवलेला भुईमूग आणि हळद भिजली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा आणि चापानेरसह (ता. कन्नड) परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.

जिल्ह्यात उद्यापर्यंत (ता. १७) ‘येलो अलर्ट’

हवामान विभागाने सिंधुदुर्गात शनिवारपर्यंत (ता. १७) ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात प्रति ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे स्पष्ट करताना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com