
Akola News: पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता अधिक वाढवल्या आहेत. विशेषतः मेहकर तालुक्यात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले असून, सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. या तीन जिल्ह्यांत सुमारे ३९ हजार ५२१ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
या भागात बुधवारी (ता. २५) आणि गुरुवारी (ता. २६) अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सर्वांत मोठा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी संकट ठरला आहे. कारण त्याचवेळी पिकांवर पाण्याचा मारा झाला. मेहकर व्यतिरिक्त, लोणार तालुक्यात १५० हेक्टर व सिंदखेडराजा तालुक्यात १८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वाशीम जिल्ह्यात ३८ महसुली मंडळांतील गावांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. १५ हजार ३०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक ११ हजार ९६४ हेक्टर एकट्या रिसोड तालुक्यात नुकसान आहे. वाशीम तालुक्यात ७८६.५०, मालेगाव २,५५२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यात चार तालुक्यांतील १३ मंडळांत अतिवृष्टी झाली. पातूर तालुक्यातील ३२ गावे बाधित झाली. ८८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये तूर, सोयाबीन, कपाशीच्या नुकसानीचा समावेश आहे. याशिवाय ३५०.८० हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे प्रत्यक्ष पंचनामे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.