
Thane News : कल्याण ग्रामीणमधील मलंगगड भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भातपिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी केलेली मशागत पाण्यात गेली. या भागात पाऊस जास्त झाल्याने यंदा पिकाची लागवड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. मात्र, दोन-तीन दिवसांपासून पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी दुबार मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करत असून, हे येथील मुख्य पीक आहे. यंदाच्या भाताच्या लागवडीसाठी बळीराजा सज्ज झाला होता. शेतीची मशागतीची कामे लवकर आटोपून बियाणे कृषी केंद्रावर कधी येतात, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र, केंद्रावर बियाणे येण्याआधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात दहा-बारा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतात केलेली मशागत वाया गेली.
पाऊस कायम राहिल्याने भातपिकाची लागवड यंदा करावी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र, पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा मशागतीची कामे हाती घेतली असून त्यांना वेग आला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात गावागावांतील शेतकरी दुबार मशागतीच्या कामात व्यग्र असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाचा भाताच्या पिकावर परिणाम होणार असला, तरी चांगले उत्पन्न काढण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.