Water Storage : भीषण उष्णतेतही धुळ्यात सिंचन प्रकल्पात ६७% पाणीसाठा शिल्लक

Dhule Water Stock : यंदा भीषण उष्णतेचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले आहेत. पण पाणीपातळी मात्र स्थिर आहे. सिंचन प्रकल्पांतही जलसाठा स्थिर आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Dhule News : यंदा भीषण उष्णतेचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले आहेत. पण पाणीपातळी मात्र स्थिर आहे. सिंचन प्रकल्पांतही जलसाठा स्थिर आहे. मध्यम व लघू प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी सुमारे ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यातील पाच लघू प्रकल्पांत जलसाठा चांगला आहे. मागील हंगामात या प्रकल्पांनी फेब्रुवारी, मार्चमध्येच तळ गाठला होता. परंतु उष्णता वाढत असल्याने आगामी काळात पाणी जपून वापरण्याची गरज आहे, अन्यथा भीषण कृत्रीम टंचाई किंवा अन्य समस्यांचा सामना पुढे पाऊल लांबल्यास करावा लागू शकतो.

पाऊस यंदा जिल्ह्यात सुमारे १२८ टक्के झाला होता. नोव्हेंबरमध्येही पाणीवापर कमी झाला. पाण्याची निकड जानेवारीत जाणवायला लागली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा नदी-नाल्यांना पूर आला होता. अनेक प्रकल्पांतून डिसेंबरमध्येही पाण्याचा प्रवाह किंवा विसर्ग सुरू होता. त्यात पांझरा, अनेर, जामखेली, मालनगाव, बुराई आदी प्रकल्पांतून डिसेंबरपर्यंत विसर्ग सुरू होता.

Water Storage
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील ७५ प्रकल्पांत उपयुक्त साठा निम्म्यावर

शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची या पाण्यावर भिस्त या प्रकल्पांवर आहे. फेब्रुवारीच्या मध्यातही यंदा टंचाई कमी आहे. पण प्रकल्पातील घटता पाणीसाठा मात्र पुढे पाऊस लांबल्यास चिंता वाढविणार आहे. यामुळे पाणीवापराबाबत काटेकोरपणा, काटकसर करण्याचे आवाहन प्रशासन, पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

धुळ्यात शिरपुरातील अनेर मध्यम प्रकल्पातून मागील वेळेसही रब्बीला पाणी मिळाले होते. कारण या प्रकल्पात जलसाठा मुबलक होता. यंदाही त्यात जलसाठा मुबलक असून, हा प्रकल्प सातपुड्यालगत असल्याने स्थिती चांगली आहे. शिरपूर तालुक्यातील उन्हाळ हंगामासही त्यातून आता पाणी मिळत आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामही यंदा जोमात आहे.

Water Storage
Water Storage : सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत साठा स्थिर

जेमतेम स्थिती

साक्रिमधील पांझरा अर्थात लाटीपाडा प्रकल्पासह मालनगाव प्रकल्पात ६८ टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. लघू प्रकल्पातील शेलबारी, विरखेल, बुरुडखे या प्रकल्पात ६९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उर्वरित काबऱ्याखडक, बेहेड, शेवाळी, ककाणी, कायांकडा या पाच लघू प्रकल्पांतही जलसाठा बरा आहे.

या प्रकल्पापैकी सध्या पांझरा आणि जामखेली प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले. त्यातील पाणीसाठा घटला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या उन्हामुळे बाष्पीभवनातूनदेखील यात घट होणार आहे. मार्चनंतर तर स्थिती आणखीच ऊन तापेल. पुढे पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन होऊन त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, अन्यथा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यंदा तुलनेत अधिक झालेल्या पावसामुळे दिलासा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com