
Jalgaon News : खानदेशातील अनेक मध्यम, लघू प्रकल्प यंदा १०० टक्के भरले होते. परंतु पाण्याचा वापर मागणी सतत असल्याने जलसाठा घटला आहे. खानदेशातील एकूण जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत आला आहे. गिरणा धरणातील जलसाठा फक्त ३५ टक्के एवढाच आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्टा, पश्चिम भागातील प्रकल्पांत जलसाठा यंदा मुबलक होता. गिरणा धरणातील पाण्याचा वापर यंदा अधिक झाला.
गिरणासह तापी, वाघूर, पांझरा आदी नद्यांत मध्यंतरी आवर्तन सोडले होते. खानदेशातील एकूण जलसाठा सुमारे ५० टक्क्यांवर स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अग्नावती, हिवरा, पारोळ्यातील बोरी, चाळीसगावातील मन्याड, एरंडोलातील अंजनी आदी या मध्यम, लघू प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता.
पण उष्णतेमुळे प्रकल्पांतील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. अनेक प्रकल्पांतील जलसाठा ४० टक्केच आहे. यंदा पाऊस चांगला असल्याने खानदेशातील सर्वांत महत्त्वाच्या नद्यांत डिसेंबरअखेरही प्रवाह होता. त्यात गिरणा, तापी, पांझरा, गोमाई, उदय, वाघूर, पांझरा या नद्यांत पाण्याचा प्रवाह डिसेंबरमध्येही होता.
गिरणा धरणातील जलसाठा यंदा १०० टक्के होता. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. त्यात मागील पावसाळ्यात फक्त ५६ टक्के जलसाठा होता. हा प्रकल्प नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. पण त्याचा लाभ जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांना होतो.
तापी नदीला प्रवाही पाणी
खानदेशात तापी, गिरणा, वाघूर, पांझरा आदी नद्या महत्त्वाच्या आहेत. तापी नदीत अलीकडेच शेळगाव बॅरेजमधून आवर्तन सोडण्यात आले होते. गिरणा धरणातूनही नदीत पाणी सोडल्याने गिरणा नदीतही सात ते आठ दिवस पाण्याचा प्रवाह असतो.
बहुळा, तोंडापुरातही जलसाठा घटला
पाचोऱ्यातील बहुळा प्रकल्पातही सुमारे ४० टक्के जलसाठा आहे. जामनेरमधील तोंडापूर प्रकल्पात ५२ टक्के, एरंडोलातील अंजनी प्रकल्पातही यंदा ५२ टक्के जलसाठा आहे. धुळ्यातील बुराई, अमरावती, मालनगाव, पांझरा, सोनवद या प्रकल्पांतही जलसाठा ५१ टक्क्यांपर्यंत आहे. पांझरा व अनेर या अनुक्रमे साकी व शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांतील जलसाठाही घटला आहे.
सातपुड्यालगतचे प्रकल्पही होताहेत रिकामे
खानदेशात सातपुडा पर्वतालगतच्या प्रकल्पांत जलसाठा घटत आहे. त्यात नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सुसरी, चिरडे, दरा या लघू प्रकल्पांतही जलसाठा ५३ टक्के आहे. तसेच धुळे जिल्ह्यात शिरपूरमधील अनेर, जळगाव जिल्ह्यात चोपड्यातील गूळ प्रकल्पातही ५० टक्के जलसाठा आहे. यावलमधील मोर, रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलमधील सुकीमध्येही जलसाठा घटला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.