
Satara News : जिल्ह्यात हळद आणि आले पीक मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे कंदकुज होण्याची शक्यता वाढते.
या भीतीने काही शेतकऱ्याने पाऊस संपल्यावर सुद्धा पाणी व अन्नद्रव्ये योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे हळद व आले पिकात काही ठिकाणी अजैविक ताण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
पाणी आणि अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अजैविक ताण बसून आल्याच्या व हळदीच्या फणीच्या बाजूला बोर, बटाट्यासारखी लहान व निमुळत्या पांढरट रंगाची बीडकुंड (अव्यय) तयार होतात. ज्या वेळी अजैविक ताण निर्माण होतो, झाडे स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतात आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी असे बीडकुंड तयार करतात.
अशा प्रकारच्या बीडकुडांचे परीक्षण केले असता पाणी आणि कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात. तरी शेतकरी बांधवांनी या अशा प्रकारचे कंद दिसल्यास योग्य प्रकारे पाणी आणि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होऊन त्याला सूत्रकृमी समजून त्याला कीटकनाशके आळवणी करून खर्च करतात. हे न करता उत्पादनात घट न येण्यासाठी योग्यवेळी भर घालणे, पाणी आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याचे बोरगाव कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.