Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Election Update : अमेठीतून राहुल आणि रायबरेलीतून प्रियंका गांधींनी लढावे यासाठी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जणू आंदोलन छेडले होते. कॉँग्रेस ‘खुल जा सिमसिम’ म्हणत जादुचा पेटारा उघडतील असे वाटत होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. प्रियांकाला इंदिरा गांधींच्या रुपात पाहणाऱ्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे.
Politics
PoliticsAgrowon

Political Theory : अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदार संघ गांधी परिवाराचे पारंपरिक आहेत. २०१९च्या तुलनेत या वेळी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत असल्याने अमेठीतून राहुल आणि रायबरेलीतून प्रियंका गांधींनी लढावे यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जणू आंदोलन छेडले होते. काँग्रेसनेही या जागांची उमेदवारी रहस्यमय ठेवली.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख शुक्रवारी होती. काँग्रेस ‘खुल जा सिमसिम’ म्हणत जादूचा पेटारा उघडतील असे वाटत होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. शेवटच्या क्षणी काँग्रेसने नावे जाहीर केल्यानंतर राहुल आणि प्रियांकावर टीकेची झोड उठायला लागली. राहुल गांधी यांनी अमेठी सोडली म्हणून विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले. प्रियांकाला इंदिरा गांधींच्या रूपात पाहणाऱ्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांचीही घोर निराशा झाली आहे.

अमेठीतून २०१४ मध्ये लाखावर मताधिक्याने राहुल गांधी यांनी भाजपच्या स्मृती इराणींचा पराभव केला होता. तत्पूर्वी २००४ पासून याच मतदार संघातून सातत्याने दोन ते तीन लाखांच्या मताधिक्याने ते निवडणूक जिंकत गेलेत. पराभव झाल्यानंतरही स्मृती इराणी पाच वर्षे अमेठीच्या संपर्कात होत्या. नंतर त्यांनी २०१९ मध्ये राहुल गांधींचा पराभव केला. मात्र गेल्या पाच वर्षांतील या मतदार संघातील चित्र बदलले आहे.

स्मृती इराणींचे लोकांशी वागणे, पत्रकारांना धमक्या देणे, मंत्रिपदाची बाधा होणे यामुळे मतदार त्यांच्यावर काहीसे नाराज आहेत. अमेठीत राहुल गांधी पुन्हा परततील, अशी अपेक्षा होती. परंतु रायबरेलीला पसंती दिल्याने त्यांना अमेठीतून जिंकण्याची खात्री नव्हती का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेली चार दशके अमेठीशी संपर्कात असलेले काँग्रेसचे आणि गांधी घराण्याचे एकनिष्ठ किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे. इराणीबाईंसमोर ते आव्हान उभे करतील यात वाद नसला तरी राहुल गांधी यांनी मतदार संघ का सोडला, हा चर्चेचा विषय झाला आहे.

Politics
Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

इंदिराजीचा वारसा!

प्रियंका गांधी यांच्याकडे पाहून अनेकांना इंदिरा गांधी यांची आठवण येते. प्रियांकाच्या भाषणापासून ते पेहरावापर्यंत त्यांची तुलना इंदिराजींशी केली जाते. चेहरा कुटुंबातून मिळू शकतो. परंतु कर्तृत्व स्वतः सिद्ध करावे लागते. इंदिरा गांधींनी अवघ्या ४२ व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आज प्रियंका गांधी ५२ वर्षांच्या आहेत. काँग्रेसच्या महासचिव म्हणून त्यांचा विशेष प्रभाव दिसला नाही.

विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत असे. त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढला. मात्र काँग्रेसला केवळ २.३३ टक्के मते मिळाली. भाजपच्या डावपेचांपुढे कॉँग्रेस खुजी पडत गेल्याचे दिसले. परिश्रम करूनही यश न आल्याने नैराश्‍य येणे स्वाभाविक आहे. परंतु प्रियंका यांनी निवडणूकच लढायची नाही हा निर्णय गांधी कुटुंबावर प्रेम करणाऱ्यांना खूपसा आवडलेला दिसत नाही.

उत्तर प्रदेशातील तेव्हाचे आणि आताचे चित्र खूप वेगळे आहे. लोकांना महागाईचे तडाखे बसताहेत आणि रोजगारासाठी वणवण फिरावे लागत आहे. लोकांना धार्मिक ध्रुवीकरण नकोसे झाले आहे. त्यामुळेच प्रियंका गांधी यांनी अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढणे गरजेचे होते, असे कॉँग्रेसचे लोक मत व्यक्त करतात. इंदिरा गांधी प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर असत. प्रियांकाची भूमिका तशीच असावी, असे अनेकांना वाटते. १९६४ मध्ये पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्या वेळी इंदिरा गांधी खासदारसुद्धा नव्हत्या. लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांना माहिती व नभोवाणी मंत्री केले.

त्या राज्यसभेवर निवडून आल्या. दुर्दैवाने १९६६मध्ये शास्त्रीजींचे निधन झाले. यानंतर काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली. मोरारजी देसाई, जगजीवनराम, के. कामराज, गुलजारीलाल नंदांसारखे दिग्गज काँग्रेसमध्ये होते. इंदिराजींनी काँग्रेसचे अध्यक्ष के. कामराज यांना विश्‍वासात घेतले व संसदीय मंडळात पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरावा, अशी गळ घातली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाईंचा इंदिरा गांधींनी पराभव केला व पंतप्रधानपद मिळविले. इंदिरा गांधी यांना नेहरूंची कन्या म्हणून पंतप्रधानपद मिळाले नाही. तर ते त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने मिळविले होते. १९७७ मध्ये रायबरेलीतून त्या पराभूत झाल्या. परंतु पुढेही त्या लढत राहिल्या.

Politics
Indian Politics : मोदींचा खरा चेहरा कोणता?

नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींप्रमाणेच प्रियंका आणि राहुल गांधींकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. किंबहुना, त्यांच्यावर त्या लादल्या जातात. गांधी कुटुंबातील कोणीही सदस्य पुढे नसले, की कॉँग्रेसची नौका डगमगत असते.

सोनिया गांधी यांच्यानिमित्ताने ‘विदेशी’चा मुद्दा नेहमी चर्चेत ठेवण्यात आला. तरीही त्यांनी कॉँग्रेसला ऊर्जा देण्याचेच काम केले. राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड हे दोन्ही मतदार संघ जिंकल्यास रायबरेलीला सोडण्याची वेळ आली तर अमेठी आणि रायबरेली हे मतदार संघ गांधी कुटुंबाचे होते, अशी इतिहासात नोंद होईल.

सत्तेसाठी वाटेल ते!

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हे अभियान राबविले होते. परंतु देशात खरेच महिलांचा सन्मान होतो का? सात महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे बाहुबली खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यासाठी ‘जंतरमंतर’वर आंदोलन झाले.

निष्पन्न काय झाले? पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनाच फरफटत नेले. परंतु ब्रीजभूषणवर कारवाई करण्याची मोदी सरकारची हिंमत झाली नाही. त्यांच्यावर खुनापासून ते ‘गॅंगस्टर अ‍ॅक्ट’पर्यंतचे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे आहेत. ब्रीजभूषणला हात लावला, तर उत्तर प्रदेशात भाजपच्या अनेक जागांवर धक्का बसू शकतो, म्हणून भाजपने त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला तिकीट दिले.

कर्नाटकातील प्रकार तर भयावह आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेला ‘जेडीएस’चा उमेदवार प्रज्वल रेवण्णा याच्यावर अनेक स्त्रियांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या प्रचारसभा घेताना मोदींना याची कल्पना असेल तर ही बाब निंदनीयच म्हणावी लागेल. आता तर प्रचारही टोकाचा होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉँग्रेसवर आरोप करताना पदाच्या मर्यादा ओलांडताना दिसतात. गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले जाईल, घरातील खोली तुमची नसेल, तुमची एक म्हैस हिरावण्यात येईल अशी भाषणे होत आहे.

मोदी म्हणतात, ‘ मी २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे. भाजपकडून त्याच्या जाहिराती केल्या जातात. ८० कोटी लोकांना मोफत धान्य देत असल्याचे अभिमानाने सांगणारे फलक लावले गेले आहेत. याचा अर्थ देशातील १०५ कोटी लोक हे दारिद्र्यरेषेखाली होते असे समजायचे का? २०१२ मध्ये देशातील १७ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याचे आकडे आहेत. मोदींच्या दहा वर्षांच्या काळात केवळ विकासाची गंगा वाहत होती, तर भारत इतका दारिद्र्यात कसा गेला?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com