Fruit Processing Industry : गावागावांत फळप्रक्रिया उद्योग उभे राहावेत

Krushna Bir Chaudhary : फळ प्रक्रिया उद्योग गावोगावी निर्माण करून शेतीमालाचे मूल्यवर्धन करणाऱ्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, असे मत भारतीय कृषक समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णबीर चौधरी यांनी व्यक्त केले.
Krushna Bir Chaudhary
Krushna Bir ChaudharyAgrowon

Nagar News : शेतकऱ्यांच्या शेतीमालाची प्रक्रिया झाली तर अधिक रक्कम मिळू शकते. त्यासाठी फळ प्रक्रिया उद्योग गावोगावी निर्माण करून शेतीमालाचे मूल्यवर्धन करणाऱ्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, असे मत भारतीय कृषक समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णबीर चौधरी यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २७) भारतीय कृषक समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णबीर चौधरी, ‘इफ्को’चे अध्यक्ष दिलीप संघानी, जम्म-काश्मीरचे विक्रांत डोबरा, कर्नाटकचे लिंगराज पाटील, सुनील चौधरी, हिमाचलचे अजित तेवतिया, महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष नलांगे, लखनऊचे संजय राय, उत्तर प्रदेशचे बच्चू सिंग चौधरी, ज्योती सुरसे, विष्णू ढवळे, अॅड. तेजस्वी तवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Krushna Bir Chaudhary
Fruit Processing Industry : पुरंदरच्या तिघा उच्चशिक्षित मित्रांचा पल्प, स्लाइस निर्मिती उद्योग

कृष्णबीर चौधरी म्हणाले, की शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी मोबाइल व्हॅन उपलब्ध करून शेतकऱ्यांचा शेतीमाल ग्राहकांच्या घरोघरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, त्यासाठी भारतीय कृषक समाज प्रयत्न करणार आहे.

शेतीमालाची आधारभूत ठरवली जावी यासाठीही कृषक समाज प्रयत्न करणार असून, सरकारने ठरवून दिलेल्या दराच्या खाली खरेदी झाली तर संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. किसान क्रेडित कार्डची मर्यादा वाढवून ती एक वर्षापर्यंत करावी,

Krushna Bir Chaudhary
Amla Farming : आवळा प्रक्रिया उद्योगातील संधी

शेतीमालाचे मूल्यवर्धन होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी कंपन्या सुरू झाल्या पाहिजेत व त्यासाठी सरकारी पातळीवर भरीव प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकरी कंपन्यांना असलेल्या अटी शर्ती काढून त्यांना कोणत्याही परवान्याची गरज नसावी, त्यांना देशात कोठेही शेतीमाल विक्री करता यावी यासाठी प्रयत्न व्हावेत.

शासनाच्या विविध विभागांतील लोकांना शेतीमाल पोहोच करण्यासाठी करण्यासाठी प्राधान्य द्यावे, त्यातून सरकारचा खर्च वाचेल असे कृष्णबीर चौधरी यांनी सांगितले. या वेळी डॉ. अनुपमा पाथ्रीकर, सी. आर. पिंपळकर, मिलिंद प्रभू यांचा कृषिभूषण, तर शिवाजी डोळे, अशोक खाडे, व बी. टी. गोरे यांचा कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com