Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Swabhimani Shetkari Sanghtana Sugarcane Conference 2025 : माजी खासदार राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी निर्माण करून सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीच्या समोर नवं आव्हान उभं केलं आहे. आता ते शेतकरी संघटनेची ऊस परिषद घेणार आहेत.
Raju Shetty
Raju ShettyAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीच्या समोर समोर बंडखोरीचे संकट उभे आहे. यातच आता तिसऱ्या आघाडीने देखील पेच निर्माण केला आहे. याचदरम्यान आता तिसऱ्या आघाडीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २५ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या परिषदेतून शेट्टी यांच्यासह तिसरी आघाडी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निर्माण केली आहे. तर सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीला शह देण्यासह पर्याय देण्यासाठीच आघाडीची निर्मिती केल्याचं मत नेत्यांचं आहे. तर राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता आघाडीने सत्ताधाऱ्यांसह प्रमुख विरोधक असणाऱ्या मविआला घेरलं आहे. तर आता राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी शेट्टी यांनी कंबर कसत राजकारण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Raju Shetty
Raju Shetti : साखर नियंत्रण कायद्यात गूळ उद्योगाचा विचार करावा

राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामातील २३ वी ऊस परिषद घेण्याची घोषणा केली आहे. ही ऊस परिषद २५ ऑक्टोंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावरती होणार आहे. तर गत हंगामातील उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रतिटन दोनशे रूपये देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पैसे दिले नाहीत तर कारखान्यांचे धुराडी पेटवू देणार नाही, असाही इशारा शेट्टी यांनी दिलाय.

Raju Shetty
Raju Shetti: फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कडक कारवाई करा, राजू शेट्टी यांची मागणी; एसपी महेंद्र पंडित यांची घेतली भेट

तसेच या परिषदेतून शेट्टी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील असे बोलले जात आहे. तर आता ऊस परिषदेतून शेट्टी सत्ताधारी महायुतीला घेरणार की मविआवर हल्लाबोल करणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार? याकडे पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे लक्ष लागले आहे. याआधी देखील शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर आसूड ओढले होते.

यावेळी शेट्टी यांनी, देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला. साखरेसह उपपदार्थांना चांगले दर मिळाले. मात्र राज्यातील साखर कारखानदार एफ.आर.पी वगळता दुसरा हप्ता द्यायला तयार नाहीत. तर सरकार देखील कारखादारांच्या पाठीशी आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहे. तर विरोधी पक्ष मुग गिळून गप्प बसल्याची टीका, शेट्टी यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com