Land Acquisition Issue: सुरत-चेन्नई मार्गासाठी जबरदस्तीने भूसंपादन

Crop Destruction: सोलापूर जिल्ह्यात सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामासाठी जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या गव्हाच्या पिकावर जेसीबी घालून महामार्गाचे काम सुरू करण्यात आले, यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Solapur News: सुरत-चेन्नई या महामार्गाचे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले असून, महामार्गासाठी जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. यासाठी मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील चार शेतकऱ्यांच्या सुमारे तीन एकर गव्हाच्या पिकामधून जेसीबी घालत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Farmer Issue
Land Acquisition : भूसंपादन भरपाईवर उच्च न्यायालयाचे दिशानिर्देश

सुरत-चेन्नई महामार्गाचे चेन्नई ते अक्कलकोट दरम्यानचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी हायवा जाण्यासाठी दहा फुटाच्या रस्त्याची तातडीने आवश्यकता असल्याने शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचा विचार न करता, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने गहू पीक जमीनदोस्त करून कामाला सुरुवात केली आहे. गव्हाचे हिरवेगार पीक जमीनदोस्त करताना शेतकऱ्यांचा कन्नड भाषेत सुरू असलेला आक्रोश पाहून राज्यभरात इतर बाधित शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

या घटनेचा परिणाम प्रस्तावित शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांवर देखील झाला आहे. बाधित शेतकऱ्यांना तीन आठवडे ते एक महिना मुदत दिली असती, तरीदेखील पीक पदरात पडले असते. या महामार्गाचा मोबदला उचलला नसतानाही पोलिस बंदोबस्तासह बळाचा वापर पिकांचे नुकसान करण्यात आले आहे.

Farmer Issue
Land Acquisition : तळेरे-करूळ महामार्ग भूसंपादनावरून जमीनमालक आक्रमक

...या शेतकऱ्यांचे नुकसान

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेसाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील शरणबसप्पा मल्लिनाथ भुती (गट नंबर ४९१) यांची ५० गुंठे, सूर्यकांत दरेप्पा हिरतोट (गट नंबर ४९७) यांची १९ गुंठे, शिवचलप्पा श्रीमंत हिरतोट (गट नंबर ४९८) यांची १९ गुंठे, तर सुरेश बसवण्णा हिरतोट (गट नंबर ४९९) यांची १७ गुंठे या चार शेतकऱ्यांच्या मालकीच्या व कब्जेवहिवाटीच्या एकूण १०५ गुंठे जमिनीवरील पिकांचे नुकसान करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांची जमीन बागायत असतानाही कोरडवाहू गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे बाधित शेतकऱ्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.

मुळात या शेतकऱ्यांची जमीन बागायत असतानाही जिराईत म्हणून भरपाईची आकारणी करण्यात आलेली आहे. याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. तरीही पंधरा दिवसांपूर्वी असा फौजफाटा या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पाठविण्यात आला होता. संबंधित शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला स्वीकारलेला नाही. तसेच भूसंपादन विभागाने या जमिनीचा मोबदला न्यायालयातही जमा केलेला नाही. तरीही देखील एनएचआयने जमिनीचा ताबा घेतला आहे.
ॲड. बसवराज बेरड, बाधित शेतकऱ्यांचे वकील
संबंधित शेतकऱ्यांना आम्ही दीड वर्षापासून वारंवार वेळ दिलेली आहे. त्यांनी साठ दिवसांच्या आत अपिल करणे आवश्यक होते. मात्र तरीही त्यांनी अपिल केलेले नाही. हायवा जाण्यासाठी दहा फूट जमीन तरी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. मात्र शेतकरी कोणत्याच प्रक्रियेला तयार नसल्यामुळे बळाचा वापर करावा लागला.
विनायक मगर, तहसीलदार अक्कलकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com