Kolhapur Dams Water : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने अनेक धरणांत पाणीसाठा कमी होता. दरम्यान पाऊस न झाल्याने धरणातील उपसा नियंत्रण करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने नियोजन केल्याने पाण्याची कुठेही कमतरता जाणवली नाही, परंतु राधानगरी धरणात यंदा मात्र गतवेळपेक्षा पाणीसाठी कमी आहे तर काळम्मावाडी धरणाला गळती असुनही यंदा पाणीसाठा जादा असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणात कमी तर, काळम्मावाडी जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राधानगरी धरणात १.५६ टीएमसी, तर काळम्मावाडी धरणात १.६६ टीएमसी पाणीसाठा होता. आज राधानगरीमध्ये १.५६ तर काळम्मावाडी धरणात २.६९ टीएमसी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवेल, अशी परिस्थिती होती. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात झालेला वळीव पाऊस तसेच, सध्या असणारे ढगाळ वातावरणामुळे शेतीसाठी लागणारा पाणीसाठा कमी झाला आहे.
त्यामुळे काही धरणांमध्ये जास्त आणि काही धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला आहे. हे पाणी जपून वापरले पाहिजे, असे आवाहन केले जात होते. आता मॉन्सूनपूर्व वातावरण होत आहे. मॉन्सूनची शक्यता लवकरच असल्याने हा साठा पूर्ण क्षमतेने पुरवून उरेल, असे चित्र आहे.
यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी होईल, असाही अंदाज व्यक्त केला होता. मात्र, वेळोवेळी झालेल्या वळीव पावसाचा आधार मिळाला आहे. शेतीला या पावसाचा भरपूर फायदा झाला आहे. यामुळे नदीतील पाणी उपसा कमी होण्यास मदत झाली आहे.
यावर्षीचा पाणीसाठा टीएमसीमध्ये
राधानगरी १.५६, तुळशी १.१३, वारणा ४.६२, दूधगंगा २.६९, कासारी ०.८१, कडवी १.१४, कुंभी १.१०, पाटगाव १.२६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.