
Dharashiv News : खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या केवायसी पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान क्षेत्रानुसार ही मदत देण्यात येत आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे.
जिल्ह्यातील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील अतिवृष्टीची मदत मंजूर झाली होती. त्यासाठी २२१ कोटी ८१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. राज्य शासनाने ता. १० डिसेंबर रोजी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून दोन हजार ९२० कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.
ता. आठ ऑक्टोबर २०२४ च्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, धाराशिव, कळंब, वाशी आणि परंडा या चार तालुक्यांना मदत मिळणार आहे. धाराशिव तालुक्यातील ६५ हजार ६३३ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४७ लाख, परंडा तालुक्यातील १४ हजार ३९५ शेतकऱ्यांना नऊ कोटी ४४ लाख रुपये, कळंब तालुक्यातील ६५ हजार ३३१ शेतकऱ्यांना ७३ कोटी ४५ लाख रुपये, तर वाशी तालुक्यातील ३५ हजार ५७ शेतकऱ्यांना ४० कोटी तीन लाख रुपये मिळणार आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ९७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली आहे. ही प्रक्रिया सुरूच आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मदत द्यावी, अन्यथा एक आठवड्यानंतर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र, तत्पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होण्यास सुरवात झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.