
Ahilyanagar News: चांगल्या थंडीचा परिणाम तसेच वातावरण चांगले असल्याने यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात आंब्याला दर वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगला मोहर आल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा आंबा उत्पादन चांगले असेल असे दिसते आहे. मोहर चांगल्या स्थितीत असला, तरी मोहराची काळजी घेण्याबाबत कृषितज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात साधारण तीस हजार हेक्टरपेक्षा अधिक आंब्याचे क्षेत्र आहे. अलीकडच्या काळात शेतकरी आंबा लागवडीला प्राधान्य देत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवडीसाठी अनुदान घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षांचा विचार केला तर आंबा लागवडीलाच प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे आंब्याचे क्षेत्र वाढत असून त्यातही केसर आंब्याची अधिक लागवड झाली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या झाडांना आता मोहर आला आहे. गेल्या वर्षी धुके, ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोहराचे नुकसान झाले होते.
त्यामुळे गतवर्षी आंबा उत्पादनावरही परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात. यंदा आंबा मोहर चांगला आला आहे. गेल्या महिनाभरापासून थंडी टिकून आहे. शिवाय धुक्याचे प्रमाण अल्प असल्याने मोहराला पोषक वातावरण आहे. अशीच स्थिती राहिली तर आंब्याचे उत्पादन यंदा चांगले असेल असे शेतकरी सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.