Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ' विरोधात शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, किसान सभेचा इशारा

Goa Nagpur Shaktipeeth Highway : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग निर्णय सरकारने मागे न घेतल्यास त्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवा असा इशारा किसानसभेकडून देण्यात आला.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Nagpur Goa Highway : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग निर्णय सरकारने मागे न घेतल्यास त्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवा. पर्यावरण नाश, पाण्याचे स्त्रोत धोका, शेतजमिनीचा नाश, टोलचा भुर्दंड यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा निर्णय आहे,' अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे गिरीश फोंडे यांनी केली.

दरम्यान उद्या (ता.१९) ला महामार्ग रोखण्याचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. साजणी (ता. हातकणंगले) येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या मेळावा काल (ता.१७) घेण्यात आला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी याला विरोध केला.

कोल्हापूर ,सांगली रास्ता रोको आंदोलन पुढे ढकलले

साजणी येथील मेळाव्यात शक्तिपीठ महामार्ग विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यामध्ये थोडासा बदल करून ते आंदोलन २८ मार्चनंतर घेण्याचे ठरले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुढील तारीख सर्वांना कळवली जाईल अशी माहिती कृती समितीकडून देण्यात आली आहे.

या बैठकीत यावेळी २० जणांची निमंत्रक समिती नेमण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग गॅझेट नोटिफिकेशन रद्द करा, गावागावात शक्तिपीठ महामार्ग विरोधात ग्रामसभांचे ठराव करणार, गावांमध्ये गॅझेट नोटिफिकेशनची होळी करणार, शासन नियुक्त उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या हरकती सामुदायिकपणे दाखल करणार, प्रत्येक गावात कृती समितीची स्थापना असे ठराव एकमताने साजणी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मंजूर करण्यात आले.

यावेळी बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे नेते गिरीश फोंडे म्हणाले,"मंत्र्यांनी कंत्राटदारांकडून भरमसाठ पैशाची लाच घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाद्वारे या पैशाची कंत्राटदारांना परतफेड केली आहे. पर्यावरण नाश, पाण्याचे स्त्रोत धोका, शेतजमिनीचा नाश, टोलचा भुरदंड, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास त्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवा.

Shaktipeeth Highway
Shaktipith Mahamarg : देव देवतांच्या नावाखाली सरकारचा १२ हजार कोटींच्या घोटाळा : राजू शेट्टी

जिल्हा परिषदेचे माजी सभापती महादेव धनवडे म्हणाले, "ज्याप्रमाणे बळीराजाला वामनाने षडयंत्र रचून मारले तसेच आजचे राज्यकर्ते हे शेतकरी बळीराजाला त्याची जमीन हिसकावून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. या शासनकर्त्यांच्या विरोधात शेतकऱ्याने आंदोलनाचे रान उठवले पाहिजे.

अध्यक्षस्थानी साजणीचे सरपंच शिवाजी पाटील म्हणाले," कोणीही मागणी न करता सरकारने अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराने भांडवलदारांचे कल्याण करण्यासाठी व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी हा महामार्ग आणला आहे. या महामार्गाला हद्दपार करा.

यावेळी जम्बू चौगुले, मानाजीराव भोसले, अशोक पाटील, नितीन मगदूम, अमित कुमार, पाटील, महेश लोहार,अमित चुडाप्पा, सुरज पाटील, राजेश पाटील, प्राचार्य व्ही एम पाटील, पोपट पाटील, मलगोंडा पाटील, गुणधर चौगुले, अप्पा पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com