
Jalgaon News : खानदेशात कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरूच आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे अतिपाणी उपसा, मागील काळापासूनचे दुष्काळी क्षेत्र किंवा खालावलेली जलपातळी अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवे वीज संयोजन कृषिपंपांना दिले जात नसल्याची माहिती आहे.
जळगाव, धुळे जिल्ह्यात सुमारे दोन हजार नवे वीज संयोजन मागणीचे प्रस्ताव काही महिने रखडले आहेत. मार्चपासून अनेकांचे प्रस्ताव रखडले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे काही वर्षांपूर्वी ज्या विहिरी अनुदान तत्त्वावर मागासवर्गीय, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांनादेखील वीज संयोजन मिळत नसल्याची माहिती आहे.
प्रस्ताव सादर, कार्यवाही नाही
शेतकऱ्यांनी वीज संयोजनासाठी प्रस्ताव दिले. पण संयोजन मिळत नाही. शेतकरी आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरी, कूपनलिका तयार करतात. परंतु नवे रोहित्र घ्यावे लागेल, संबंधित भागातील रोहित्रावर नवे संयोजन जोडता येणार नाही, तशी परवानगी नाही, नव्या रोहित्रासाठी एक लाख रुपये खर्च येईल, अशी बतावणी वीज वितरण कंपनीमधील मंडळी करते. यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकची वाढत असून, ही समस्या कोणाकडे सांगावी व मार्ग कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
प्रशासन मुजोर
प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. वीज कंपनीच्या कार्यालयात अनेक कर्मचारी सहकार्य करीत नाहीत. अधिकारी भेटण्यास नकार देतात. यामुळे या खरिपातही पूर्वहंगामी (बागायती) कापूस पीक शेतकरी केवळ कूपनलिका किंवा विहिरीला वीज संयोजन नसल्याने घेवू शकले नाहीत.
ही स्थिती मागील रब्बी हंगामातही होती. यामुळे रब्बीदेखील शेतकरी घेवू शकले नाहीत. याबाबत शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. पण दखल घेतली जा नाही. मागील वेळेस ज्या भागात दुष्काळ होता, त्या भागात अतिउपसा करणे कायद्याने योग्य नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.