Ravikant Tupkar: कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी मुंबईत मोर्चा: रविकांत तुपकर

Loan Waiver Demand: राज्य सरकारने निवडणुकीत दिलेली कर्जमाफीची घोषणा अद्याप पूर्ण केली नाही, याचा निषेध म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने १९ मार्च रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Pune News: कांदा, कापूस, सोयाबीन, ऊस, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले असताना, सरकारला त्यांचे कोणतेही गांभिर्य नाही. सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरत आहे. सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारात कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. मात्र आता सरकार आपणच केलेल्या घोषणेपासून लांब पळत आहे.

सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी १९ मार्च रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आणि शेतकरी कर्जमाफी करा या मागण्यांसाठी मोर्चा काढणार असून, होणाऱ्या परिणामांना सरकारने सामोरे जावे, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी सोमवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिला.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar: शेतकरीप्रश्‍नी रस्त्यावरची लढाई लढणार : रविकांत तुपकर

संघटनेची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तुपकर बोलत होते. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, युवा आघाडी अध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन काकडे, विदर्भ अध्यक्ष किरण ठाकरे, उत्तर महाराष्‍ट्र अध्यक्ष ईश्‍वर पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदित्य आरेकर, व्याख्याते यशवंत गोसावी, सत्तार पटेल आदी उपस्थित होते.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar: पीकविमा आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री, कृषी सचिवांशी थेट चर्चा

तुपकर म्हणाले, ‘‘राज्यात सोयाबीनचे ६०-६५ लाख टन उत्पादन होत आहे. सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र सरकारने केवळ १० ते १२ लाख टन खरेदी केली आहे आणि खरेदी फक्त व्यापाऱ्यांची केली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सोयाबीनला ८ हजार रुपये दर अपेक्षित असताना, हमीभाव केवळ चार हजार रुपये आहे. दराअभावी गेल्या तीन वर्षांपासूनचे सोयाबीन घरात आहे. दर नसल्यामुळे शेतकरी सोयीबीन विकू शकत नाहीत. सरकारने खरेदी न केल्यास आम्ही सोयाबीन अरबी समुद्रात टाकून देऊ.’’

‘लाडक्या बहिणीं’नी मोर्चा काढला नव्हता

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी बहिणींनी मोर्चा काढला नव्हता. आमच्या बहिणींना सांभाळायला आम्ही सक्षम आहोत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळाला तर आम्ही कर्जमागणीसाठी आणि योजनांसाठी सरकारच्या दारात जाणार नाही. आम्ही कर्जमाफीसाठी मोर्चा काढणार आहे. ज्याच्यासाठी मोर्चा काढतो ती मागणी पूर्ण झाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, असेही तुपकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com