Fruit Crop Insurance : केळी, आंबा, पपई उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

Crop Insurance : नैसर्गिक आपत्ती व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना आहे.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Nandurbar News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२३-२०२४) नंदुरबार जिल्ह्यात केळी, आंबा व पपई या फळपिकांना लागू असून, या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना आहे. ही योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ज्या महसूल मंडळात संबंधित फळपिकाखालील क्षेत्र २० हेक्टरपेक्षा जास्त आहे अशा अधिसूचित मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यात सापेक्ष आर्द्रता, किमान तापमान व गारपीट यांसारख्या हवामानामुळे होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण दिले जाणार आहे.हवामान धोक्याचे ट्रिगर कार्यान्वित झालेल्या महसूल मंडळातील या फळपीक विम्यात सहभागी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईचा दर महावेध प्रकल्पाच्या माध्यमातून महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येतो.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेच्या परताव्यांचा मुहूर्त मिळेना

यात गारपीट, वेगवान वाऱ्यामुळे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसानभरपाई अंतिम केली जाईल. नंदुरबार जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा ग्राहक सेवा क्रमांक १८००१०२४०८८ असा आहे.

Fruit Crop Insurance
Fruit Crop insurances : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी विमा योजना

या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी व पपई फळपिकासाठी ३१ ऑक्टोबर २०२३, तर आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज विमा हप्ता ग्राहक केंद्रामार्फत ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी व्हावे, असेही श्री. वाणी यांनी कळविले आहे.

योजनेतील फळपिके, संरक्षण व पीकविमा दर

केळी व आंबा फळपिकासाठी रुपये एक लाख ४० हजार विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना सात हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. पपईसाठी रुपये ३५ हजार विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना एक हजार ७५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com