Fruit Crop Insurance : भरपाईअभावी शेतकऱ्यांची फळपीक विम्याकडे पाठ

Crop Insurance Scheme : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात मृग बहरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू आणि लिंबू उत्पादक शेतकरी विमा योजनेत सहभागी होत आहेत.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Sangli News : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात मृग बहरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू आणि लिंबू उत्पादक शेतकरी विमा योजनेत सहभागी होत आहेत. यंदाच्या मृग बहरात पीक कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा ६ हजार ४५५ शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे.

परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळत नाही. परिणामी, विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार ३७ शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे. नुकसान झाले, तर त्याचे पंचनामे होऊन, त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जातो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : हवामानाधारित फळपीक विमा योजनेत चार पिकांचा समावेश

त्यानंतर पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. पीकविम्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभाग दरवर्षी गावागावांत जनजागृती करत आहे. गतवर्षी मृग बहरात १३ हजार ४९२ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेतला असून, १० हजार ९६ हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष, पेरू आणि लिंबू पिकांना संरक्षण दिले होते.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळ पीकविम्यासाठी जळगावात १०११ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

जिल्ह्यात यंदाच्या मृग बहरातील फळ पिकासाठी ६ हजार ४५५ हजार शेतकऱ्यांना सहभाग नोंदवला आहे. पीक कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा शेतकऱ्यांनी ४ हजार ४२७ हेक्टरवरील फळ पिकांना संरक्षण दिले असून, विम्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ४ लाख ८७ हजार २५३ रुपये रक्कम भरली आहे. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांत मृग बहरातील डाळिंब पिकासह अन्य फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे पंचनामेदेखील झाले.

अवघ्या ६३६ शेतकऱ्यांना मिळाला पीकविमा

गतवर्षी मृग बहरात जिल्ह्यातील १३ हजार ४९२ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा भरून १० हजार ९६ हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब, पेरू, लिंबू या पिकांना संरक्षित केले होते. त्यापैकी ६५५ शेतकरी पात्र असून ६३६ शेतकऱ्यांना २ कोटी ४५ लाख ९ हजार ७२० रुपयांची भरपाई त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. परंतु १९ शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com