Solapur News : उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर झालेली घट आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली वीज कपात यामुळे उजनी धरण काठावरील शेतकरी अडचणीत आला आहे. करोडो रुपये खर्च करून उभी केलेली पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी झालेले पर्जन्यमान व उजनी धरणाच्या पाण्याचे झालेले चुकीचे नियोजन याचा फटका करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार असून, हे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत येणार असल्याचे चित्र आहे. मार्च महिना सुरू असतानाच उजनी धरणाची पाणीपातळी मायनस ३६ टक्के खाली गेली आहे.
नऊ ते दहा हजार फूट पाणी खाली गेल्याने उजनी धरणावरून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत.
धरण काठावरील ज्या शेतकऱ्यांनी करोडो रुपये खर्च करून धरणात चारी खोदून पाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या पाणीपुरवठा योजना सुरू असल्या तरी सध्या प्रशासनाने दोन तास वीजकपात करण्याचे आदेश दिल्याने या योजनाही अडचणीत आल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.