
Buldana News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला असून, बियाणे व खते खरेदीसाठी बाजारपेठेत चौकशी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिके कपाशी व सोयाबीन असून, त्याचे उत्पादन हे पाऊसमान, जमिनीचा पोत, व शेती मशागत यावर अवलंबून असते. सोयाबीन पिकामध्ये स्वपरागीकरण होत असल्याने दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
योग्य प्रकारे साठवण व प्रक्रियेनंतर तीन वर्षांपर्यंत बियाणे वापरता येऊ शकते, त्यामुळे खर्चात बचत होते. तथापि, जिल्ह्यातील काही भागात विशिष्ट कंपन्यांचे बियाणे आणि खत यांचा आग्रह शेतकरी करताना दिसून येत आहे.
कपाशीच्या सर्व वाणांमध्ये एकसारखे बिटी जैव तंत्रज्ञान असते व उत्पादन क्षमतेत विशेष फरक नाही. त्यामुळे कोणत्याही एकाच वाणाचा हट्ट करणे योग्य नाही. शेतकऱ्यांनी, घरच्या बियाण्याची योग्य चाळणी, बीजप्रक्रिया व उगवणशक्तीची चाचणी करूनच बियाणे वापरावे.
१०० मिमी पावसाच्या नंतर २ ते ३ सें.मी. खोलीवर पेरणी केल्यास उगवणीत अडथळा येणार नाही. बियाणे खरेदी करताना नेहमी पक्के बिल घ्यावे, लेबलवरील लॉट नंबर व बिलातील लॉट नंबरची खातरजमा करावी असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.