Crop Damage Compensation : शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचितच

Heavy Rain Crop Loss : मागील खरिपात पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधी मंजूर झाला. ई-केवायसी करण्यासंबंधी शेतकऱ्यांना निर्देश देण्यात आले.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : मागील खरिपात पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधी मंजूर झाला. ई-केवायसी करण्यासंबंधी शेतकऱ्यांना निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली. पण अद्यापही अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.

गेल्या खरीप हंगामात (२०२२) सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. बऱ्याच गरजू शेतकऱ्यांनी हात उसनवारी व काहींनी बँकांचे कर्ज काढून आपल्या शेतीत पैसा ओतला.

मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा पाण्यात गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शेतकरी संघटनांनी शासनाकडे मागणी लावून धरली.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांच्या मदतीसाठी २०४ कोटींचा निधी

त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्यात सर्वांत जास्त पारोळा तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मंजूर झाला. तब्बल ५८ हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करण्याचे जाहीर करण्यात आले.

त्याप्रमाणे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सेतू केंद्रात जाऊन अंगठा ठेवून ई केवायसी केली. त्यानुसार चाळीस हजारांच्या वर शेतकऱ्यांना मदतीचा लाभ झाला. मात्र यातील उर्वरित शेतकऱ्यांनी मागील ऑगस्ट महिन्यात यादीत नाव आल्यानुसार सेतू केंद्रात ई-केवायसी केली. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : संत्रा-सोयाबीन उत्पादकांना भरपाईचा प्रस्ताव ः विखे

दरम्यान, शासनाकडून यादी येणे, त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे, तसेच शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करणे, एवढेच काम ‘महसूल’चे आहे. मात्र शेतकऱ्यांना मदतीच्या निधीबाबत महसूल विभागालाच दोष देत त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही मदत शासनाकडून मिळणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार प्रमाणीकरण केले असेल व सेतू केंद्रात ई केवायसी केली असेल, अशा शेतकऱ्यांना तो लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे. त्यांनी बँकेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे तसेच तेथील केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, एवढीच अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मी आपले सरकार केंद्रात ई-केवायसी केली आहे. मात्र माझ्या खात्यावर अतिवृष्टीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या खात्यावर रक्कम जमा करावी.
- सुभाष पाटील, शेतकरी, पारोळा शिवार, जि.जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com