Alibaug News : जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तिथल्या एकेका ठिकाणाची इत्थंभूत माहिती असते. जंगल संवर्धनासाठी त्यांच्या माहितीचा वापर करून घेण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातून अभियानाची सुरुवात झाली असून ५७ गावांमधील १६ हजार ९६० एकर जमिनीचे सामुदायिक वनाचे अधिकार आदिवासींना देण्यात आले. या जमिनीवर वनीकरण, जलसंधारण, मृदसंवर्धन यासह उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करून दिली जाणार असून प्रतिव्यक्ती पाच हजार रुपये रोजगार उपलब्ध होणार आहे. परिणामी आदिवासींचे स्थलांतर रोखता येईल.
साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर होते. नोकरी व्यवसायासाठी ही कुटुंबे इतर जिल्ह्यात जातात. यासाठी या गावांचा तत्काळ वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ५७ गावांमधील आदिवासींच्या गरजांनुसार या आराखड्यात बदल असणार असून हे आराखडे २०२४ अखेर पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु आचारसंहितेमुळे कामात दिरंगाई होत असल्याचे आदिवासींसाठी काम करणाऱ्या संघटनांचे आहे.
कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, रोहा, माणगाव, अलिबाग या तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. वीट भट्टी, कोळसा खाणी या ठिकाणी वेठबिगार म्हणून ही कुटुंब काम करतात. बरेचदा यात त्यांची फसवणूक होते. ठरलेला मोबदला मिळत नाही. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. शिक्षणापासून वंचित राहिल्याने या समाजाच्या सामाजिक, आर्थिक विकासार परिणाम होतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.