Marathwada Development : मराठवाड्यातील ५२ हजार कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती

Industries Minister Uday Samant : गुंतवणूक ही मराठवाड्याचा सर्वांगीण, शाश्वत विकास करण्याबरोबरच आर्थिक क्रांती घडवणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
Industries Minister Uday Samant
Industries Minister Uday SamantAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यामध्ये एथर एनर्जी, लुब्रिजॉल, जेएसब्ल्यू, टोयोटा किर्लोस्कर यासारख्या उद्योग समूहांनी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक मराठवाड्याचा सर्वांगीण, शाश्वत विकास करण्याबरोबरच आर्थिक क्रांती घडवणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

मसिआच्या चिकलठाणा परिसरातील मुख्य कार्यालयातील रत्नप्रभा पवार सभागृहात सोमवारी (ता. १२) उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मसिआमार्फत करण्यात आले होते. राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मलिकनेर, सह कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी,

Industries Minister Uday Samant
Indian Agricultural Research : कृषी संशोधन विकसीत १०९ वाणांपैकी महाराष्ट्रातील हवामानाला २७ वाणांचा होणार उपयोग

महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त किरण पवार, पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, एथर एनर्जी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रतो कुमार मित्रा, टोयोटा किर्लोस्कर उद्योग समूहाचे उप व्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश मारू. जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे प्रकल्प व्यवस्थापक बीभू नंदा, लुब्रिझॉलचे प्रतिनिधी नितीन मेनगी यांच्यासह मराठवाड्यातील विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Industries Minister Uday Samant
Indian Agricultural Research : कृषी संशोधन विकसीत १०९ वाणांपैकी महाराष्ट्रातील हवामानाला २७ वाणांचा होणार उपयोग

श्री. सामंत म्हणाले, की या गुंतवणुकीमुळे लघुउद्योगास प्रोत्साहन मिळेल. तसेच प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होतील. तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन पूरक उद्योग विकासाला चालना मिळेल. उद्योगासाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

उद्योग उभारताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी शासन घेत आहे. राज्याच्या या धोरणांमुळे आगामी काळात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत मसिआ या उद्योग संस्थेमार्फत मंत्री उदय सामंत व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com