Rain Update
Rain Updateagrowon

Rain Update : कोरडवाहू पिकांना पावसामुळे दिलासा

Unseasonal Rain : खानदेशात बेमोसमी पावसात फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. तसेच काही भागात पशुधनाची व जीवित हानीदेखील झाली आहे. परंतु या पावसाने कोरडवाहू रब्बी पिकांना दिलासा मिळाल्याची स्थिती आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशात बेमोसमी पावसात फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. तसेच काही भागात पशुधनाची व जीवित हानीदेखील झाली आहे. परंतु या पावसाने कोरडवाहू रब्बी पिकांना दिलासा मिळाल्याची स्थिती आहे.

खानदेशात परतीचा पाऊस आलाच नाही. कमी ओलावा असल्याने कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी अनेक शेतकरी करू शकले नाहीत. तसेच ज्यांनी कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी केली होती, त्या शेतकऱ्यांच्या पिकास पाण्याची गरज होती.

Rain Update
Crop Damage : पावसामुळे भात, स्ट्रॅाबेरीचे नुकसान ; रब्बी पिकांना मात्र दिलासा

कारण थंडी गायब झाली होती. उष्णता ऑक्टोबरमध्ये सुमारे ३४ अंश सेल्सिअस एवढी होती. या महिन्यातही किमान तापमान १० अंश सेल्सिअसखाली काही दिवस राहिले. कमाल दिवस किमान तापमान १३ अंश सेल्सिअसवर होते. थंडी नसल्याने कोरडवाहू रब्बी पिकांना सिंचनाची गरज तयार झाली होती.

काही शेतकऱ्यांची पेरणी जमिनीत ओलावा नसल्याने रखडल्याने त्यांनी पूर्वमशागत करून शेत भिजविण्याची तयारी केली होती. यातच पाऊस आल्याने कोरडवाहू रब्बी पिकांना लाभ झाला आहे. तसेच शेत भिजविण्यासाठी वेळ, श्रम व पाणी खर्च करण्याची गरज नसल्याने पुढे संबंधित क्षेत्रात पूर्वंमशागत करून पेरणी करता येईल.

खानदेशात सुमारे २८ महसूल मंडलांत अतिवष्टी झाली आहे. रविवारी (ता.२६) व सोमवारी (ता.२७) पाऊस आला. काही भागात हलका, मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांना लाभ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Rain Update
Rain Update : पावसामुळे घाटाखालील तालुक्यात पिकांना दिलासा

खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी व हरभरा पीक आहे. या पिकांना बऱ्यापैकी लाभ झाला असून, पुढे वाढही जोमात होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात कोरडवाहू हरभऱ्याचे क्षेत्र २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. तर दादर ज्वारीचे क्षेत्र सुमारे १३ हजार हेक्टर एवढे आहे. ही पेरणी जळगाव, धुळ्यात तापी, अनेर, पांझरा, गिरणा नदीच्या क्षेत्रात अधिक झाली असून, या भागाला लाभ होणार आहे.

पावसामुळे सिंचन बंद

पाऊस सुरू असल्याने शेतीकामे ठप्पच आहेत. यातच केळी, भाजीपाला व इतर पिकांचे सिंचन बंद झाले आहे. जमिनीत बऱ्यापैकी ओलावा असल्याने वाफसा स्थिती पुढील काही दिवस कायम राहील. यामुळे किमान आठवडाभर लहान केळी, मका, ज्वारी व इतर फळ पिकाच्या सिंचनाची गरज नाही. यामुळे भूगर्भातील पाण्याची बचत होत असल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com