Drought Crisis : भीषण दुष्काळाची चाहूल

Drought Update : जालना जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून दुष्काळसदृश म्हणून जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. या दुष्काळाची भीषणता आता हळूहळू जाणवत असून नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तब्बल ८२ टँकर सुरू आहेत.
Drought
Drought Agrowon
Published on
Updated on

Jalna News : जालना जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून दुष्काळसदृश म्हणून जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. या दुष्काळाची भीषणता आता हळूहळू जाणवत असून नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तब्बल ८२ टँकर सुरू आहेत.

तर जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी तीन मध्यम, तर ५७ लघुप्रकल्पांपैकी तब्बल ४१ लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळाची चाहूल लागली असल्याचे यातून दिसून येते.

Drought
Drought Condition : मराठवाड्यातील प्रकल्प देताहेत दुष्काळाची चाहूल

निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दगा दिल्याने यंदा खरिपासह रब्बीही शेतकऱ्यांच्या हातून गेल्यात जमा आहे. त्यात अल्प पावसामुळे पाणी पातळी खोल गेली आहे. शिवाय पाणी साठ्यांनी दम तोडला असून मध्यम आणि लघू प्रकल्पाने तळ गाठला आहे.

सद्यः स्थितीमध्ये जिल्ह्यात सात मध्यम आणि ५७ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ९.९१ टक्के पाणीसाठा असून तो आरक्षित करण्यात आला आहे. तीन मध्यम आणि ४१ लघुप्रकल्पांत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यात भोकरदन तालुक्यातील जुई, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा मध्यम प्रकल्प आणि अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

Drought
Drought Condition : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी केलेले उपोषण मागे

आज घडीला जिल्ह्यात तब्बल ८२ टँकर सुरू आहेत. यात ३८ गावांसाठी ५७ तर भोकरदन शहरासाठी २५ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. यात पुढील काळात अजून भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या भीषण दुष्काळाची चाहूल हिवाळ्यात लागल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे.

अशी आहे टँकरची स्थिती

जालना तालुक्यातील आठ गावांसह चार वाड्यांमधील २९ हजार २८१ ग्रामस्थांना १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा. एकूण ३७ विहिरींचे अधीग्रहण

बदनापूर तालुक्यातील १२ गावे, आठ वाड्यांतील ४२ हजार १९६ ग्रामस्थांसाठी १७ टँकरव्दारे पाणी पुरवठा, १७ विहिरींचे अधीग्रहण

भोकरदन तालुक्यातील १३ गावे, एक वाडीवरील १९ हजार ८२० ग्रामस्थांसाठी १४ टँकर, १६ विहिरींचे अधीग्रहण

भोकरदन नगरपालिका हद्दीतील ३२ हजार ६८० नागरिकांसाठी २५ टँकर, सहा विहिरींचे अधीग्रहण

मंठा तालुक्यातील एका वाडीवरील एक हजार २५० ग्रामस्थांसाठी एक टँकर, १३ विहिरींचे अधीग्रहण

घनसावंगी तालुक्यातील पाच गावे, सहा वाड्यांवरील ११ हजार ११२ ग्रामस्थांसाठी सात टँकर, १६ विहिरींचे अधीग्रहण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com