Drought Condition : मराठवाड्यातील प्रकल्प देताहेत दुष्काळाची चाहूल

Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील एक व ७५० लघु प्रकल्पांपैकी धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगरमधील मिळून ५० लघु प्रकल्प कोरडेच आहेत.
Drought Condition
Drought ConditionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील एक व ७५० लघु प्रकल्पांपैकी धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगरमधील मिळून ५० लघु प्रकल्प कोरडेच आहेत. मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांत ४७ टक्केच असलेला उपयुक्त पाणीसाठा दुष्काळाच्या संकटाची चाहूल देत आहे.

मराठवाड्यातील ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये १३ ऑक्टोबर अखेर ४७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामध्ये तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांत ७४ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ५२ टक्के, मोठ्या अकरा प्रकल्पांत ५४ टक्के तर ७५ मध्यम व ७४९ लघु प्रकल्पांत सरासरी ३१ टक्केच शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Drought Condition
Karnataka Drought Condition : केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार?

बीडमधील एक प्रकल्प कोरडा असून छत्रपती संभाजीनगर, जालनामधील प्रत्येकी दोन, बीडमधील पाच, लातूरमधील तीन, धाराशिवमधील सहा व नांदेडमधील एका प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. ७५० लघु प्रकल्पांपैकी ५० प्रकल्प कोरडे आहेत.

त्यामध्ये धाराशिवमधील सर्वाधिक १७, छत्रपती संभाजीनगरमधील ९, बीडमधील ६, लातूरमधील ३, प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधील २४, जालनामधील ३९, बीडमधील ५१, लातूरमधील ३०, धाराशिवमधील ९५, नांदेडमधील एक व परभणीतील आठ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

Drought Condition
Drought Condition : ‘दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही’

जायकवाडीत आवक थांबली, साठा स्थिर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पात १० ऑक्टोबरपासून पाण्याची आवक थांबली आहे. ९ ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी ७१७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी जायकवाडीत ४७.७० टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात शनिवारी (ता. १४) सकाळी सहा वाजताच्या सुमारास ४७.२३ टक्के पाणीसाठा होता.

जालन्यातील लघु प्रकल्पांची अवस्था बिकट

जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांत केवळ आठ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय, जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत २२ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. धाराशिवमधील सर्वाधिक २०६ लघु प्रकल्पांत केवळ १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

परभणीतील २२ लघु प्रकल्पांत १४ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघु प्रकल्पांत २९ टक्के, बीडमधील १२६ लघु प्रकल्पांत २४ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत २९ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पांत ९८ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पांत ८४ टक्के उपयुक्त पाणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com