
Solapur News : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे एकूण ६२ टँकर बंद झाले आहेत. मात्र, दक्षिण सोलापूर तालुक्यात चार व अक्कलकोटमध्ये एक अशा पाच गावांना सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यांच्या रोज १३ खेपा होत आहेत. या दोन्ही तालुक्यांतील गावे ही एकाच परिसरातील असून या भागात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात यंदा मे महिन्यात ६९ टँकरद्वारे ५९ गावे व ५८७ वाड्या- वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू होता. एक लाख ४५ हजार ९९० इतकी लोकसंख्या तर ६० हजार ९१६ जनावरे बाधित होती. त्यांना पाणी पुरवण्यासाठी रोज १४९ खेपा मंजूर होत्या. मात्र, रोज १०४ पर्यंत खेपा होत होत्या. यंदा लवकरच १३ मे पासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली.
त्यानंतर सतत १७ दिवस पाऊस पडत राहिला. त्यामुळे चार मे पर्यंत एकूण ५० टँकर बंद झाल्या होत्या. त्यानंतर १९ टँकरद्वारे १९ टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात होता. पावसामुळे टँकरवर होणारा खर्च वाचला आहे. आता पाच गावांसाठी सात टँकर सुरू आहेत. महिनाभर सतत पाऊस पडूनही अद्याप जिल्ह्यातील टँकर पूर्णतः बंद झाले नाहीत.
पुरेशा पावसाचा अभाव
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी, कणबस, बंकलगी, दोड्डी व अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही सर्व गावे एकाच भागातील आहेत. इंगळगी, सुलेरजवळगे या गावांचा पाणीपुरवठा शिरवळच्या धुबधुबी प्रकल्पावर अवलंबून आहे. बंकलगी, कणबसला विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. कणबस पाणीपुरवठा विहिरीच्या वरील पाचही बंधारे भरले नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.