Water Crisis : लघू तलावांत ९ टक्के, मध्यम प्रकल्पांत १३ टक्के पाणीसाठा

Water Storage : पाणलोटात जोरदार पाऊस झाला नाही. तापमानात वाढ झाली. मागील १५ दिवसांत परभणी जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात १ टक्क्याने घट झाली.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : पाणलोटात जोरदार पाऊस झाला नाही. तापमानात वाढ झाली. मागील १५ दिवसांत परभणी जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात १ टक्क्याने घट झाली. गुरुवारी (ता. १२) लघू प्रकल्पांमध्ये ३.७५५ दलघमीनुसार सरासरी ९ टक्के पाणीसाठा होता.

१ तलाव कोरडा पडला तर १६ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली होता. केवळ ५ लघू तलावांमध्ये पाणीसाठा होता. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये ६.६६८ दलघमीनुसार सरासरी १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

जायकवाडी पाटबंधारे विभागाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे. मेमध्ये झालेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या लघू तलावांत पाणीसाठा जमा झाला होता.

Water Crisis
Solapur Water Crisis : पावसाळ्याला सुरुवात; अजूनही १९ टँकर सुरू

गुरुवारी (ता. २९) घेतलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ४.१६४ दलघमीनुसार १० टक्के होता. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७.२५८ दलघमीनुसार १० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. पाणीसाठ्यात घट झाली.

लघू प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

गुरुवारी (ता. १२) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार भोसी (ता. जिंतूर) लघू तलाव कोरडा पडला. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळगाव, कोद्री (ता. गंगाखेड), देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, कवडा, दहेगाव, मांडवी (सर्व ता. जिंतूर), तांदूळवाडी (ता. पालम) या १६ तलावांचा समावेश आहे.

वडाळी (ता. जिंतूर) येथील लघू तलावांत १० टक्के, पाडाळी (जि. जालना) येथील लघू तलावांमध्ये ११ टक्के पाणीसाठा होता. झरी (ता. पाथरी) येथील लघू तलावांमध्ये ८२ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील लघू तलावांत ५ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील लघू तलावांमध्ये ३६ टक्के पाणीसाठा होता. २०२४ च्या १२ जून रोजी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ०.६१३ दलघमी (२ टक्के) पाणीसाठा होता. त्या वेळी १३ लघू तलाव कोरडे पडले होते, तर ६ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली होता.

Water Crisis
Palghar Water Crisis : पालघर जिल्ह्याचा पाणीप्रश्न पेटणार

मध्यम प्रकल्पांत १३ टक्के पाणीसाठा

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.

गुरुवारी (ता. १२) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात २.१३४ दलघमीनुसार ९ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ४.५३४ दलघमीनुसार १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६.६६८ दलघमीनुसार १३ टक्के पाणीसाठा होता. २०२४ मध्ये १२ जून रोजी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा नव्हता. मासोळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com