
Ratnagiri News : अवेळी पावसामुळे २०१५ ला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतीचे मोठे नुकसान झालेले होते. त्यामधून सावरण्यासाठी शासनाने व्याजमाफी आणि कर्ज पुनर्गठनाचा दिलासा दिला होता; मात्र अटीशर्तींमुळे काही शेतकरी वंचित राहिले होते.
पंचनामे उपलब्ध नसतील तरीही बाधित बागायतदारांना व्याजमाफी दिली जावी, असा निर्णय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने घेतलेला आहे, असे आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले.
फेब्रुवारी आणि मार्च २०१५ मध्ये या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर देण्यात आली होती.
ही अट विचारात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील ६५२ पात्र खातेदारांना ५५ लाख ८२ हजारांची व्याजमाफी देण्यात आली तथापि, निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी १९ सप्टेंबरला शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी आणि मार्च २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यत अवेळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा बागायतीचे २४ हजार ७४४.०४ हेक्टर आणि काजू बागायतीचे १३ हजार ५४३.६५ हेक्टर असे एकूण ३८ हजार २८७.६९ हेक्टरचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यात ८७ हजारांवर शेतकरी बाधित झालेले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.