Mango Cashew : सिंधुदुर्गात आंबा, काजूला पालवी फुटण्यास सुरुवात

जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून हे वातावरण आंबा, काजू बागांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात आहे.
Fruit farming
Fruit farmingAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून हे वातावरण आंबा, काजू बागांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस लांबला. त्यामुळे बागायतीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

Fruit farming
Silk Farming : रेशीम व्यवसायात पायवाट केली भक्कम

दरम्यान पाऊस थांबल्यानंतर दहा-बारा दिवसांपूर्वी थंडीला सुरुवात झाली; मात्र थंडी दोनच दिवस पडली आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही भागांत पाऊसदेखील पडला; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे.

परंतु, गुरुवारी थंडीत चांगलीच वाढ झाली. आंबा, काजू बागांसाठी थंडी आवश्यक होती. वाढलेली थंडी बागांच्या दृष्टीने अनुकूल मानली जात आहे. थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास चांगली पालवी येईल, अशी अपेक्षा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com