Seed Treatment : बीजप्रक्रियेतून सोयाबीनवरील कीड-रोगांना प्रतिबंध

Soybean Farming : मागील ५ ते ६ वर्षांपासून महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने पिवळा मोझॅक विषाणू, कळी करपा (नेक्रोसिस) किंवा इंडियन बड ब्लाइट या विषाणूजन्य रोगाचा आणि खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होत आहे.
Pests on soybeans
Pests on soybeansAgrowon
Published on
Updated on

डॉ. वर्षा टापरे, राजीव घावडे, मंगेश दांडगे

Soybean Seed Treatment : मागील ५ ते ६ वर्षांपासून महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने पिवळा मोझॅक विषाणू, कळी करपा (नेक्रोसिस) किंवा इंडियन बड ब्लाइट या विषाणूजन्य रोगाचा आणि खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होत आहे.

काही ठिकाणी त्यांचा उद्रेक होत असल्याची स्थिती दिसते. खरेतर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केल्यास या कीड-रोगांना बऱ्यापैकी अटकाव करणे शक्य आहे. बीज प्रक्रिया ही सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.

खोडकुज व मूळकुज

या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव पेरणीनंतर सुरुवातीच्या रोपावस्थेत साधारण एक महिन्याच्या कालावधीत जास्त पाऊस व शेतामध्ये पाणी साचल्यामुळे होतो. त्याचप्रमाणे शेंगा अपरिपक्व अवस्थेत असताना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जास्त पाऊस, शेतात पाणी साचणे किंवा २० ते ३० दिवसांचा प्रदीर्घ पावसाचा खंड व प्रखर उष्णतामान अशा हवामान स्थिती राहिल्यास रोगाचा उद्रेक वाढतो.

कळी करपा किंवा नेक्रोसिस

याचे लक्षण म्हणजे झाडाचा शेंडा तपकिरी रंगाचा होऊन खालच्या बाजूने झुकून गुंडाळल्यासारखी हूक निर्माण होते. यास कळी करपा या नावाने संबोधतात. झाडाची वाढ खुंटते आणि करपलेली दिसतात. पानाची देठे काळी पडतात. शेंग धारणा होत नाही किंवा कमी होते. शेंगातील दाणे विकसित होत नाहीत. फुलकिडीद्वारे पसरणाऱ्या विषाणूंमुळे या रोगाचा प्रसार होतो.

Pests on soybeans
Cotton Soybean Market : कापूस, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

कॉलर रॉट

या रोगामुळे सोयाबीनची रोपे कोलमडून जमिनीवर पडतात. मोठ्या झाडांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाचे मूळ व खोड यांच्या जोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. बुरशी बीजेही आढळतात. या भागाची सड होऊन झाड सुकते, पिवळे पडते आणि नंतर मरून जाते. या रोगामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येते.

मूळ व खोडसड

(चारकोल रॉट / कोळशाची सड)

रोपावस्थेत असताना या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. प्रादुर्भावाची सुरुवात जमिनीलगतच्या खोडावर व मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची व मुळांची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्नपुरवठा होत नाही. पाने पिवळे पडून गळतात. अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात.

रोगग्रस्त झाडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशी बीजे (मायक्रोस्लेरोशिया) दिसून येतात. जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस हे रोगांच्या प्रसारास पोषक ठरते. रोगग्रस्त झाडे कमजोर होऊन अकाली मरतात.या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ७७ टक्क्यांपर्यंत घट येते.

खोडमाशी

खोडमाशी ही कीड सोयाबीन पिकाच्या १० ते १५ दिवसांच्या रोप अवस्थेपासून कापणीपर्यंत बहुतांश सर्व अवस्थांमध्ये आढळून येते. या किडीची २ मि.मी. लांबीची, काळी चकचकीत प्रौढ मादी पानाच्या पेशीमध्ये ८० ते ८५ अंडी टाकते. अंड्यातून २ ते ७ दिवसात बाहेर पडलेली अळी पानाच्या शिरेमधून देठामध्ये व नंतर देठांमधून मुख्य फांदीत व खोडामध्ये शिरते.

या काळात आतील भाग पोखरून पोकळ करत असल्याने नागमोडी पोकळी तयार होते. साधारणपणे २० ते २५ दिवसांच्या कालावधीत फांदी व खोडामध्ये अळी व कोष आढळून येतात. कोषात जाण्यापूर्वी अळी जमिनीलगत किंवा वरच्या भागात खोडाला किंवा फांदीला छिद्र तयार करते. हे छिद्र कोषातून बाहेर पडलेल्या माशीला बाहेर पडण्याची उपयोगी ठरते. या किडीची एक पिढी ३२ ते ५७ दिवसांत तयार होते.

त्यामुळे खरीप हंगामातील पिकात या किडीच्या अनेक पिढ्या तयार होतात. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीच्या एक महिन्याच्या रोपावस्थेत झाडाचे शेंडे झुकतात, पाने पिवळी पडून सुकतात व शेवटी मरतात. एक महिन्यानंतर झालेल्या खोडमाशी प्रादुर्भावामुळे झाडे सहसा मरत नाही. मात्र शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते.

दाण्याचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते. पूर्वी या खोडमाशीमुळे १६ ते ३० टक्के नुकसान होत असल्याचे नमूद आहे. मात्र प्रादेशिक संशोधन केंद्राच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासात सोयाबीन पिकाचे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे आढळले.

खोडमाशी

खोडमाशी ही कीड सोयाबीन पिकाच्या १० ते १५ दिवसांच्या रोप अवस्थेपासून कापणीपर्यंत बहुतांश सर्व अवस्थांमध्ये आढळून येते. या किडीची २ मि.मी. लांबीची, काळी चकचकीत प्रौढ मादी पानाच्या पेशीमध्ये ८० ते ८५ अंडी टाकते.

अंड्यातून २ ते ७ दिवसात बाहेर पडलेली अळी पानाच्या शिरेमधून देठामध्ये व नंतर देठांमधून मुख्य फांदीत व खोडामध्ये शिरते. या काळात आतील भाग पोखरून पोकळ करत असल्याने नागमोडी पोकळी तयार होते. साधारणपणे २० ते २५ दिवसांच्या कालावधीत फांदी व खोडामध्ये अळी व कोष आढळून येतात.

कोषात जाण्यापूर्वी अळी जमिनीलगत किंवा वरच्या भागात खोडाला किंवा फांदीला छिद्र तयार करते. हे छिद्र कोषातून बाहेर पडलेल्या माशीला बाहेर पडण्याची उपयोगी ठरते. या किडीची एक पिढी ३२ ते ५७ दिवसांत तयार होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकात या किडीच्या अनेक पिढ्या तयार होतात.

खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीच्या एक महिन्याच्या रोपावस्थेत झाडाचे शेंडे झुकतात, पाने पिवळी पडून सुकतात व शेवटी मरतात. एक महिन्यानंतर झालेल्या खोडमाशी प्रादुर्भावामुळे झाडे सहसा मरत नाही. मात्र शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते. दाण्याचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते.

पूर्वी या खोडमाशीमुळे १६ ते ३० टक्के नुकसान होत असल्याचे नमूद आहे. मात्र प्रादेशिक संशोधन केंद्राच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासात सोयाबीन पिकाचे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे आढळले.

Pests on soybeans
Soybean Seed : सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

बीजप्रक्रियेचे फायदे

पिकावरील मर, मूळकुजसाठी कारणीभूत रोगकारक बुरशी जमिनीतच असतात. अनुकूल वातावरण मिळताच त्यांची वाढ होऊन रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव होतो. केवळ बीजप्रक्रियेमुळे खोडामाशीसह मूळकुज, मर, कॉलर रॉट, हिरवा व पिवळा मोझॅक आणि कळी करपा या रोगापासून सरासरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन पिकाचे संरक्षण होते.

कीटकनाशकाच्या बीजप्रक्रियेमुळे रसशोषक किडी, खोडमाशी व अन्य किडींपासून पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित राहते.

जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाला नत्राची उपलब्धता वाढून उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते व रासायनिक खताची बचत होते.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्व सोयाबीनवर बुरशीनाशक, कीडनाशक आणि जिवाणू संवर्धन खतांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याचा क्रम प्रथम रासायनिक बुरशीनाशक, नंतर कीटकनाशकाची प्रक्रिया आणि सर्वांत शेवटी जैविक खत संवर्धक असा असावा.

रासायनिक घटकांची प्रक्रिया पेरणीपूर्वी सोयीनुसार ८ ते १० दिवस आधी करून ठेवावी. त्यानंतर पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्वी २ तास आधी जैविक खत संवर्धकाची प्रक्रिया करावी.

रासायनिक घटक : कार्बोक्झिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम अधिक थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे. (लेबल क्लेम आहे.)

वरील रासायनिक बुरशीनाशक वापरले नसल्यास पेरणी दिवशी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी. यासोबत ब्राडीरायझोबिअम जापोनिकम २५ ग्रॅम अधिक पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

राजीव घावडे, ९४२०८४१४२१

(सोयाबीन रोग शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती (अंतर्गत) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com