Climate Change : वातावरण बदलाचा सीताफळ बागांना फटका

Sitafal Orchard : यंदाचा सीताफळाचा हंगाम बऱ्याच भागात मागेपुढे झाला आहे. आतापर्यंत ३० ते ४० टक्क्यांवर फळे विक्री झाल्याचा अंदाज असून आता सीताफळाचा रेग्युलर बहर घेतलेल्या बागांमधील माल विक्रीला येऊ लागला आहे.
Sitafal
Sitafal Agrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाचा सीताफळाचा हंगाम बऱ्याच भागात मागेपुढे झाला आहे. आतापर्यंत ३० ते ४० टक्क्यांवर फळे विक्री झाल्याचा अंदाज असून आता सीताफळाचा रेग्युलर बहर घेतलेल्या बागांमधील माल विक्रीला येऊ लागला आहे. आठवडाभरात सर्वत्र बागांमधून सीताफळ निघायला सुरुवात होईल, असे शेतकरी सांगत आहेत.

मागील काही वर्षात राज्यात सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधल्या गेलेले आहे. यामुळे बागांची संख्या वाढली. दरवर्षी लागवड क्षेत्र विस्तारते आहे. राज्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड क्षेत्र झालेले आहे. दसरा-दिवाळीच्या काळात सीताफळाचा हंगाम सर्वच शिगेवर पोचलेला असतो. यार्षी असमतोल स्वरूपाच्या पावसाचा फटका सीताफळ बागांनाही बसला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हाळ्यात पाणी देऊन बागांचे नियोजन केलेल्या ठिकाणची फळे विकून झाली आहेत. आता सर्वत्र नियमित बहर फुटलेल्या बागांमधील माल विक्रीसाठी तयार होत आहे. पुढील आठवड्यात या बागांमधून सार्वत्रिक स्वरुपात फळे विक्रीला येत आहेत.

Sitafal
Sitafal Production : सीताफळाची मृग बहारातील फळधारणा घटली

दुसरीकडे काही भागातील विक्री सुद्धा सुरु झालेली. चांगल्या दर्जाची फळे सुरुवातीला १०० ते १२० रुपयांनी विकली आहेत. आता सुद्धा ७० ते ८० रुपयांदरम्यान प्रतिकिलो दर मिळतो आहे. तर दुय्यम फळे ४० ते ६० रुपयांदरम्यान विकत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. यंदा दर्जेदार फळांचे प्रमाण व संख्या बागांमध्ये कमी असल्याचेही शेतकरी सांगत आहेत.

Sitafal
Sitafal Market : पूर्वहंगामी सिताफळाला ९ हजार रुपये दर
राज्यात यावर्षी सुरुवातीलाच सासवड, पुरंदरच्या भागातील फळे आली. उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांनी बागांना पाणी देत बहर घेतला. मधल्या काळात औरंगाबाद, जालना भागातील फळे विक्रीला येऊन गेली. आता तिसऱ्या टप्प्यात रेग्युलर बहर आलेल्या भागातील फळे विक्रीला येत आहेत. यंदा भाव चांगला मिळतो आहे. काही ठिकाणी शेतातूनच फळ विक्रीचा ट्रेंड सेट होऊ लागला आहे. राज्यात आतापर्यंत सीताफळाचा किमान ५० टक्के हंगाम आटोपला. गेल्या वर्षाच्या तुलनेत मालाची सरासरी बऱ्याच प्रमाणात कमी दिसत आहे.
- अनिल बोंडे, सचिव, सीताफळ महासंघ, महाराष्ट्र राज्य
यंदा जमिनीत व हवेतही आर्द्रता नसल्याचा फटका सीताफळाला बसला आहे. त्यामुळे वजनदार फळे नाहीत. दर्जावरही परिणाम झालेला आहे. चांगल्या फळांना ११० ते १२० पर्यंत मागणी आहे. या हंगामात दुय्यम दर्जाची फळेच अधिक मिळत आहे. राज्यातील उन्हाळी बहर यापूर्वीच संपलेला असून आता रेग्युलर बहर सुरू झाला आहे.
- श्‍याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ, महाराष्ट्र राज्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com