'Majhi Ladki Bahin' Scheme : लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून वक्तव्य केलं आहे.
CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde And DCM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून वक्तव्य केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेवरून महिलांना आश्वासन दिले आहे. तर फडणवीस यांनी याच योजनेवरून घोषणा केली आहे. जळगाव येथील सागर पार्क मैदानावर आयोजित महिला सशस्क्तीकरण अभियानात मंगळवारी (ता.१३) ते बोलत होते. यावेळी शिंदे यांनी, अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील असे म्हटले आहे. तर फडणवीस यांनी अद्याप ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत, ते अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत मंजूर केले जातील, असे आश्वासन दिले आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्तीव पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा व युवक मंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या.

शिंदे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या राजकीय टीका होत आहे. यावरून महाविकास आघाडीतील अनेक नेते टीका करत आहेत. तर लाडकी बहीण योजना निवडणूक पूर्ती असल्याची टीका केली जात आहे. यावरून जळगाव येथील महिला सशस्क्तीकरण अभियानात शिंदे यांच्यासह फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis
'Majhi Ladki Bahin' Scheme : सर्वोच्च न्यायालयाने ताशोरे ओढले नाहीत; महसूल विभागाचा खुलासा 

शिंदे यांनी, लाडकी बहीण योजनेला राज्यात अफाट प्रतिसाद मिळत असून यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. या योजनेमुळे महायुती सरकार महिलांचे सक्षमीकरण करत असून यात शेतकरी महिला, युवतींचा समावेश आहे. पण विरोध या योजनेसह इतर योजनांवरून अपप्रचार करत आहेत. पण अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या योजनेतील पैसे परत घेतले जाणार नसून या फक्त अफवा आहेत. अशा भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

यावेळी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. तर ज्या महिलांना याआधी अर्ज भरले आहेत आणि जे मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यावर दोन महिन्याचे पैसे थेट भरले जाणार आहेत. पण जे अद्याप मंजूर झालेले नाहीत ते ३१ ऑगस्टपर्यंत मंजूर केले जातील. तर त्या सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबरमधील दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाईल. त्या महिलांना जुलैपासूनचे पैसे मिळतील अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com