
Ambegaon News: वातावरणात उष्णतेचा कडाका वाढल्याने अंडी व चिकनला मागणी कमी झाली आहे. त्यातच उष्णतेने कोंबड्यांच्या मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. अंड्याची उत्पादन क्षमता कमी झाली आहे, अशा तिहेरी संकटामुळे अंडी व चिकनचे बाजारभाव कोसळल्याने पोल्ट्री उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
उष्णतेचा कडाका वाढल्याने कोंबड्यांच्या मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. अंड्याची उत्पादन क्षमता एरवी सरासरी ९० ते ९५ टक्के असते, ती या उन्हाळ्यात काही पोल्ट्री फार्मवर ४० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. अंड्याच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मागील दोन महिन्यांपूर्वी शेकडा अंड्याचा दर उच्चांकी ६७५ रुपयांवर गेला होता. तो आता ४५५ रुपयांपर्यंत खाली आला.
त्यात व्यापारी प्रति अंड्यामागे ५० पैसे वजा करत आहे. म्हणजे शेकडा ४०० रुपये दर मिळत आहे. म्हणजे प्रती एक अंड्याला चार रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्चात मुख्य घटक असते, खाद्य खाद्याच्या कच्चा मालाचे दर वाढल्याने खर्चात वाढ झाली. व्यवस्थापन, वीजबिल, औषधे या सर्वांचा मिळून एका अंड्याला उत्पादन खर्च सव्वाचार रुपयांपर्यंत येत आहे.
त्यामुळे सध्या अंड्याला मिळणारा हा बाजारभाव पाहता अंडी उत्पादन करणारे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याचे आंबेगाव तालुक्यातील पोल्ट्री उत्पादक मोनिका करंजखेले, माया शंकर थोरात, संदीप पडवळ, विवेक वाळुंज यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.