Kolhapur Rain : कोल्हापुरात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता, वारा, गारा, धारा कोसळणार

Weather Update : १२ मे ते १६ या ५ दिवसांत वादळी वारा, गारपिटाचा पाऊस होण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
Kolhapur Rain
Kolhapur Rainagrowon

Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे काही दिवस वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकण वगळता कोल्हापूर जिल्ह्यासह २९ जिल्ह्यात पुढील एक आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दि. १६ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली.

१२ मे ते १६ या ५ दिवसांत वादळी वारा, गारपिटाचा पाऊस होण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. या पाच दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यांत मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते.

मुंबईसह संपूर्ण कोकणात पुढचे पाच दिवस तापमानात विशेष असा कोणताही बदल होणार नाही. समुद्र किनाऱ्यावर ३५ आणि २५ डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यानचे कमाल आणि किमान तापमान राहणार आहे. तर उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस यांसारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नसल्याचा दुजोरा हवामान विभागाने दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट नसेल. शिवाय ढगाळ वातावरण राहणार असल्याचे उन्हाचे चटके जाणवरणार नाहीत. दुपारच्या सत्रातील उन्हाचा तडाखा कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kolhapur Rain
Maharashtra Rain : पुढील ५ दिवस पावसाचे; राज्यभरात पावसाचा पोषक हवामान; अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

पाण्याअभावी पिके वाळू लागली

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धरणांत पाणी कमी असल्याने उपसाबंदा लागू करण्यात आली. अनेक धरणांतील पाण्याची स्थिती चिंताजनक असल्याने नद्यांचे पात्र कोरडे पडले आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांना वळीव पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पट्टा असल्याने भरपूर पाण्याची गरज भासत असते परंतु पाण्याअभावी पिके वाळू लागल्याची स्थिती पहायला मिळत आहे.

नद्याचे पात्र पडले कोरडे

जिल्ह्यात काळम्मावाडी आणि राधानगरी ही दोन प्रमुख धरणे आहेत मागच्यावेळी पाऊस कमी झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दुधगंगा आणि वेदगंगा नदीला काळम्मावाडी नदीतून पाणी पुरवठा होतो तर राधानगरी धरणातून भोगावती, कुंभी, कासारी या नद्या प्रवाहित होतात परंतु पाणी सोडले नसल्याने मागच्या ३ महिन्यात अनेक नद्यांचे पात्र ५ वेळा कोरडे पडण्याची वेळ आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com