Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल, दोन दिवसीय दौरा

Maharashtra Drought Condition : अल् निनोमुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Maharashtra Drought
Maharashtra Droughtagrowon
Published on
Updated on

Maharashtra Agriculture : अल् निनोमुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर राज्यातील धरणांमध्येही पाणी साठा कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. यावर केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून १२ सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांची पाहणी होणार आहे. १४ डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर, नाशिक, नंदूरबार व जळगावमध्ये हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या पथकात १२ सदस्य मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या ११ गावांचा यात समावेश आहे. या गावांमध्ये जात पाहणी अहवाल तयार करून केंद्रीय कृषी विभागात सादर करण्यात येणार आहे. धाराशिव, वाशी व लोहारा तालुके तसेच अन्य तालुक्यातील २७ मंडळे दुष्काळी घोषित केली आहेत.

धाराशिव तालुक्यातील ताकविकी, करजखेडा, लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा बु, माळेगाव, धानुरी, तावशीगड येथे केंद्रीय पथक पाहणी करुन धाराशिवला परतणार आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन नंतर वाशी तालुक्यातील बोरी, वाशी, विजोरा व लोणखस याभागातील पिकांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात आज(ता.१३) पाहणी दौरा केल्यावर हे पथक उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर, नाशिक व जळगाव या जिल्ह्यात जाणार आहे. दोन वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून ही पाहणी केली जाणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील पाहणी दौरे संपल्यावर पुण्यात एक महत्वाची बैठक होणार आहे त्यानंतर अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत. यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के. सहसंचालक जगदीश साहू नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा पथकात समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com