Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ रद्द करा, अन्यथा अधिवेशनावर गळफास मोर्चा

Farmer Demands: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध दर्शवत बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. १२ मार्च रोजी विधानभवनावर गळफास मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘आमचे गाव, आमचे सरकार’ या घोषणेवर भर दिला जाणार आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रद्द करावे या मागणीसाठी बारा जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येत मुख्यमंत्री फडणवीस व महायुती सरकार वारंवार शेतकऱ्यांसोबत चर्चा करतो म्हणून सांगतात; पण चर्चा करत नाहीत. त्यांना जाब विचारण्यासाठी विधानसभा अधिवेशन काळात १२ मार्चला शेतकऱ्यांचा गळफास मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

कोल्हापूर येथे गुरुवारी (ता. २०) शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, गिरीश फोंडे, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील (गोकुळ संचालक), प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, युवराज कोईगडे, विक्रम पाटील, संग्राम पाटील, युवराज पाटील, सुरेश संकपाळ उपस्थित होते.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'वरून शेतकऱ्यांचा टोकाचा इशारा ; ...तर शहीददिनी सामुदायिक...

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘निवडणुकीपूर्वी जे महायुतीच्या नेत्यांची महामार्ग रद्द करण्याची भाषा होती ती निवडणुकीनंतर पुन्हा बदलली आहे. निव्वळ कोल्हापूर जिल्हा तांत्रिकदृष्ट्या महामार्गातून वगळणे शक्य नाही. उच्च न्यायालय वगैरे अशा गोष्टी वगळून जनतेच्या न्यायालयामध्ये आता हे आंदोलन तीव्र करूया.’’

विधानसभेमध्ये जरी महायुती सरकारचे बहुमत असले, तरी रस्त्यावरती आम्हा शेतकरी व नागरिकांचे बहुमत आहे. तुमचे सरकार जरी असले तरी ‘आमच्या गावात आमचे सरकार’ या सूत्राने आंदोलन करून मंत्र्यांना व मोजणी अधिकाऱ्यांना गावबंदी, जिल्हा बंदी करू. हे सरकार निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या पाया पडत होते.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway: शक्तिपीठ’प्रश्नी कोल्हापुरात गुरुवारी राज्यव्यापी बैठक

आता मात्र निवडणूक झाल्यानंतर शक्तिपीठ महामार्ग रेटत त्यामुळे कोल्हापूर स्टाइलने आता आंदोलन करावे लागेल. मराठवाड्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहेत. मराठवाड्याला प्यायला पाणी नाही. मात्र महायुती सरकार हे पर्यायी महामार्ग असताना देखील अनावश्यक शक्तिपीठ महामार्ग आमच्यावर लादत आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. असा सूर या बैठकीत शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

बैठकीत घेण्यात आलेले ठराव पुढीलप्रमाणे

१२ मार्च रोजी विधानसभा मोर्चा काढणार.

‘आमचे गाव आमचे सरकार’ असे आंदोलनाचे सूत्र राबवणे.

दुसरी विभागीय परिषद लातूर व तिसरी ही वसमत हिंगोली येथे अनुक्रमे मार्च व एप्रिल महिन्यामध्ये घेणे.

बारा जिल्ह्यांतून भविष्यात संघर्ष यात्रा काढणे असे ठराव एकमताने करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com