
Ahilyanagar News : “पौष्टीक तृणधान्यांची उत्पादन क्षमता अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तम आहे. शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक उपयोग करावा लागेल, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि विविध पोषण समस्यांवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात पौष्टीक तृणधान्याचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात शनिवारी (ता. २२) एक दिवसीय पौष्टीक तृणधान्य महोत्सव झाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र प्रमुख डॉ. विजू अमोलीक, उपविभागीय अधिकारी राजेंद्र सुपेकर, प्रवीण गोसावी, विजय शिंदे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
सुधाकर बोराळे म्हणाले, की पौष्टीक तृणधान्याला मागणी अधिक आहे. जिल्ह्यातील स्थितीही उत्पादनासाठी उत्तम आहे. त्यामुळे या तृणधान्याचे क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पादनाला प्राधान्य द्यावे आणि क्षेत्र वाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांच्या उत्पादन घेतल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. या वेळी कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी तृणधान्यांच्या महत्त्वाबाबत चर्चा केली.
डॉ. अमोलिक यांनी, तृणधान्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. कर्जतचे उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, शास्त्रज्ञ विजय शिंदे, डॉ. विक्रम कड, नेब्र्स्का (अमेरिका) येथून कार्यक्रमासाठी आलेले नेब्बलम यांनी यांनी मार्गदर्शन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.