Bogus Seed : बोगस बियाण्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत; वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Fake seed scam : "बोगस बियाणे येत असतील तर गंभीर बाब आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून बोगस बियाणे विक्री आणि निर्मिती करणाऱ्यावर दहा वर्षांची शिक्षा करणारं बील आणावं. तसेच शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आणि फसवणाऱ्या माफ करता कामा नये, अशी भूमिका सरकारने स्वीकारावी." अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Farmer Karjmafi : महाराष्ट्र बोगस बियाण्यांचा अड्डा झाला असून बोगस बियाण्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचलेली आहेत, असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. ते गुरुवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्याकडे लक्ष वेधलं.

वडेट्टीवार म्हणाले, "आळीमिळी चुपीचिळी तुम्ही आम्ही मिळून खाऊ, असा प्रकार राज्यात झाला आहे. बोगस बियाण्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत. सगळे मिळून हा प्रकार राजरोसपणे करतात. यावर मुख्यमंत्री लक्ष घालतील, नाहीतरी शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये." असंही वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केलं.

Vijay Wadettiwar
Bogus Agri Inputs : बोगस खते, बियाणे विकणाऱ्यांची गय नाही

राज्यात शेतकरी आत्महत्या गंभीर प्रश्न झाला आहे. नैसर्गिक आपत्ती, नापिकी, सरकारची उदासीन धोरण आणि कर्जबाजारीपणामुळे' शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. यावर वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली.

वडेट्टीवार म्हणाले, "बोगस बियाणे येत असतील तर गंभीर बाब आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून बोगस बियाणे विक्री आणि निर्मिती करणाऱ्यावर दहा वर्षांची शिक्षा करणारं बील आणावं. तसेच शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आणि फसवणाऱ्या माफ करता कामा नये, अशी भूमिका सरकारने स्वीकारावी." अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाकडे लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यावर थातुरमातुर औषधोपचार करण्याची चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. परंतु ठोस निर्णय झाला नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याबद्दल राज्य सरकारकडून काही भूमिका आली नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात बोगस बियाणे आणि खत लिंकिंगने शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यावरून खरीप आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच चांगले बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सारथी पोर्टलची मदत घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com