
Karmala News: वादळी वारा व पावसाने करमाळ्यातील चिखलठाण परिसरातील केळीबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये पाणी साचल्याने केळीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असून, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई मिळावी, भरपाई रकमेमध्ये वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मागील आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व गेल्या आठवडाभर होत असलेल्या सततच्या पावसाने चिखलठाण, शेटफळ, उमरड, वांगी, कंदर, वाशिंबे यासह तालुक्यातील सर्वच गावांतील केळी बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली असून, सततच्या पावसाने या बागेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हातचे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी, केळीसाठी खर्च जादा होत असल्याने भरपाईची रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. सध्या कृषी सहायकांचा संप सुरू असून पंचनामे करण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे कोणी येताना दिसत नसल्याने शेतकरी वर्गामधून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.