Bihar Farming Success: बिहारमध्ये केळी उत्पादनात तिप्पट वाढ, राज्य सरकारचा दावा

Bihar Agriculture: बिहार मध्ये केळी उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळत आहे.राज्य सरकारच्या दाव्यानुसार, गेल्या काही वर्षांत बिहारमध्ये केळीच्या उत्पादनात तिप्पट वाढ झाली आहे. यामागे सरकारचं शेतीविषयक धोरण आणि टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे.
Bihar Farming Success
Bihar Farming SuccessAgrowon
Published on
Updated on

Patana News: बिहार मध्ये केळी उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळत आहे.राज्य सरकारच्या दाव्यानुसार, गेल्या काही वर्षांत बिहारमध्ये केळीच्या उत्पादनात तिप्पट वाढ झाली आहे. यामागे सरकारचं शेतीविषयक धोरण आणि टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

बिहारमधील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून केळीच्या लागवडीकडे विशेष लक्ष देत आहेत. यामुळे राज्यातील एकूण केळी उत्पादन आता 19 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांत केळीच्या उत्पादकतेत 125 टक्के वाढ झाली आहे.

Bihar Farming Success
Goat Farming Success: भूमिहीन मजुराने शेळीपालनातून गाठली आर्थिक सक्षमता

आता प्रति हेक्टर 45 मेट्रिक टनांपर्यंत केळीचे उत्पादन मिळत आहे, जे पूर्वीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. यामुळे बिहारमधील शेतकरी केळीच्या लागवडीतून चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत.राज्य सरकारने केळी उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक योजनांचा अवलंब केला आहे.

Bihar Farming Success
Dairy Farming Success: गोपालनात खाद्य, आरोग्य, गोठा व्यवस्थापनावर भर

यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रांचे प्रशिक्षण, उच्च प्रतीची केळीची रोपे, कमी खर्चात खतांचा पुरवठा आणि बाजारपेठेतील मागणीप्रमाणे विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. विशेषतः बिहारमधील 'कोठिया' ही स्थानिक केळीची जात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

ही जात कमी पाणी आणि खतांचा वापर करूनही उत्तम उत्पादन देते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. या जातीला स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन सहज विकता येते.कृषी विभागाचे सचिव संजय अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, "बिहारमधील शेतकरी आता केळीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत.

सरकारच्या योजनांमुळे आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली असून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे." ते पुढे म्हणाले की, सरकार आता केळीच्या निर्यातीवर विशेष लक्ष देत आहे. येत्या काही वर्षांत बिहारमधील केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली छाप पाडू शकतील, अशी आशा आहे.

यासाठी शेतकऱ्यांना निर्यातीशी संबंधित प्रशिक्षण आणि सुविधा पुरवण्याचे नियोजन सरकारने केले आहे.केळीच्या लागवडीसाठी लागणारी जमीन, पाणी आणि हवामान बिहारमध्ये सहज उपलब्ध आहे, ज्यामुळे येथील शेतकरी या पिकाकडे अधिक आकर्षित होत आहेत. तसेच, सरकारच्या अनुदानित योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे, ज्यामुळे ते आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करू शकत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com