
Solapur News : तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटाने ही निवडणूक न लढता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बागल गटाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने आतापर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे.
पुन्हा असा प्रकार ‘आदिनाथ’च्या बाबतीत होऊ नये याकरिता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. बागल गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज येत्या दोन दिवसांत माघारी घ्यावेत, असे आवाहन बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी केले आहे.
शनिवारी (ता. २९) बागल संपर्क कार्यालयात सायंकाळी श्री आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या वतीने ज्यांनी आपले फॉर्म भरले आहेत त्यांची विचारविनिमय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय विलासराव घुमरे यांनी जाहीर केला आहे.
यावेळी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, ‘आदिनाथ’चे चेअरमन धनंजय डोंगरे, चिंतामणी जगताप, कल्याणराव सरडे, रणजित शिंदे, अंगद पाटील, केरू गव्हाणे, ॲड. नानासाहेब शिंदे यांनी विचार मांडले.
यावेळी सर्वांनी एकमुखाने आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार गटाच्या नेत्या, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व मार्गदर्शक विलासराव घुमरे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी ‘मकाई’चे माजी चेअरमन व शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल यांनी आपल्या नेत्या रश्मी बागल व मार्गदर्शक विलासराव घुमरे जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.