
Sangli News : जिल्ह्यातील राजारामबापू आणि वसंतदादा साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील पहिली उचल जाहीर करत ऊसदराची कोंडी फोडली. मात्र जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांकडून अद्यापही पहिल्या उचलीबाबत मौन बाळगले आहे. त्यामुळे इतर साखर कारखाने किती दर जाहीर करणार याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. साखर कारखान्यांकडून पहिली उचल न जाहीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. कारखान्यांकडून ऊसदर जाहीर करण्याची प्रतीक्षा शेतकरी संघटनेने केली.
हंगाम सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांनंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी युनिटकडील २०२४-२५ मध्ये गळितास येणाऱ्या उसास पहिली उचल ३२०० रुपये जाहीर करत ऊसदराची कोंडी फोडली.
त्यापाठोपाठ ‘वसंतदादा’ने (दत्त इंडिया) पहिली उचल ३१५० रुपये जाहीर केला. १४ कारखान्यांपैकी चार कारखान्यांनी पहिली उचल देत दराचा तिढा सोडवला. सध्या गाळपास गती आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल प्रतिटन ३७०० रुपयांची मागणी केली होती.
‘एफआरपी’चे तुकडेच
दरवर्षी हंगाम सुरू झाला, की ऊस दराचा प्रश्न पेटला जातो. शेतकरी संघटना आंदोलन करतात. दरम्यानच्या काळात साखर कारखाने एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य करत नाहीत. त्यामुळे एफआरपीचे तुकडे केले जातात. यंदाच्या हंगामातही ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी साखर कारखानदार मागच्या पावलावर होते. मात्र यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्यापूर्वीच ऊस दराचा तिढा सोडवला. परंतु यंदाही एफआरपीचे तुकडेच केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.