Orange Farmers: संत्रा उत्पादकांच्या भरपाईवरून विधानसभा गाजली; तत्काळ मदतीची मागणी

Farmer Support: संत्रा उत्पादकांचे बुशीजन्य रोगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा मुद्दा विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी उपस्थित केला होता. सरकारने केवळ ५ टक्के नुकसान दाखवल्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त करत मदतीची मागणी केली.
Orange Farmers
Orange FarmersAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: संत्रा उत्पादकांचे बुशीजन्य रोगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा मुद्दा विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी उपस्थित केला होता. सरकारने केवळ ५ टक्के नुकसान दाखवल्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त करत मदतीची मागणी केली. त्यानंतर कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले. 

महाराष्ट्र विधानसभेत ४ जुलै २०२५ रोजी संत्रा पिकांवरील फायटोथोरा बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर सविस्तर चर्चा झाली. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार नाना पाटोले, रोहित पवार, चेतन तुपे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या उपस्थित करत सरकारला आर्थिक मदत आणि उपाययोजनांची मागणी केली.

Orange Farmers
Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

सरकारने नुकसान केवळ ५ टक्के असल्याचा दावा केला, तर शेतकऱ्यांनी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले. कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपायांची अपेक्षा आहे.

सरकारच्या उत्तरांमध्ये विसंगतीः तुपे
चेतन तुपे यांनी सांगितले की, फायटोथोरा हा बुरशीजन्य रोग संत्रा पिकांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतो. विशेषतः अमरावती आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. जास्त पाऊस, ओलसर हवामान आणि दमट वातावरणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यांनी सरकारच्या उत्तरांमध्ये विसंगती असल्याचेही नमूद केले.

Orange Farmers
Orange Farmer Issue : संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

नुकसान ५० टक्क्यापेक्षा जास्तः पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, मे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत संत्रा पिकांना पाणी दिले जाते आणि त्यानंतर पाणी कमी केले जाते. परंतु यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे सर्वत्र पाणी साचले आणि फायटोथोरा रोगाचा प्रसार झपाट्याने वाढला.

सरकार दावा करते की केवळ ५ टक्के नुकसान झाले आहे, परंतु रोहित पवार यांनी सांगितले की, ते बच्चू कडू यांना भेटण्यासाठी गेल्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले. त्यांनी सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.

मदत देणार का ? : पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारला दोन थेट प्रश्न विचारले. पहिला, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार का? आणि दुसरा, फायटोथोरा रोगावर नियंत्रणासाठी सरकार काही ठोस उपाययोजना करणार का? त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आणि तत्काळ उपायांची गरज व्यक्त केली.

सरकारचे उत्तर

या सर्व प्रश्नांना उत्तर देताना कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात संत्रा पिकाखाली १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यांच्या मते, फायटोथोरा रोगामुळे झालेले नुकसान ५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यांनी असेही नमूद केले की, सरकारला अद्याप मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जर शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले असेल, तर सरकार त्यांना योग्य तो मोबदला देईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com