Orange Farming : मृग बहर गमावलेल्या संत्रा बागायतदारांना मदत करा

Orange Mrig Bahar : संत्रा उत्पादनात मृग बहर अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्याकरिता मे तसेच जून महिन्यात बाग ताणावर सोडली जाते.
Orange Farming
Orange FarmingAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : संत्रा उत्पादनात मृग बहर अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्याकरिता मे तसेच जून महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. यंदा मात्र या महिन्यात झालेल्या पावसामुळे बागांचा ताण तुटला. त्यामुळे या वर्षी मृग बहरात फळधारणा होण्याची शक्‍यता नाही. त्याची दखल घेत संत्रा बागायतदारांना भरपाई मिळावी, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने केली आहे.

अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. त्यानुसार, राज्यात दीड लाख हेक्‍टरवर, तर विदर्भात सुमारे १ लाख २५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधिक एक लाख हेक्‍टर क्षेत्रावरील लागवड ही एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे.

Orange Farming
Orange Orchard Crisis: संत्र्याचा मृग बहर वाशीममध्ये संकटात

दर्जेदार रोपांचा अभाव, व्यवस्थापनातील त्रुटी या सर्व कारणांमुळे महाराष्ट्राची उत्पादकता मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. मृग बहराचे सुमारे पाच लाख टन उत्पादन होते. परंतु संत्रा पट्ट्यात गेल्या काही वर्षांत बागायतदार संत्रा गळतीच्या समस्येला सामोरे जात आहेत. बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव हे कारण त्यामागे दिले जाते.

याचा परिणाम संत्रापट्टयातील अर्थकारणावर झाला असतानाच आता अनिश्‍चित पावसामुळे देखील मृग बहर धोक्‍यात आला आहे. मृग बहर घेण्यासाठी शेतकरी मे व जून महिन्यात बाग ताणावर सोडतात. त्यानंतर पावसाच्या पाणी बरसल्यावर हा ताण तुटतो. यंदा मात्र मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Orange Farming
Orange Orchard Deals: संत्रा बागांचे सौदे चढ्या दराने

त्यामुळे मृग बहराचा ताण तुटला आणि आता फळधारणा होणारच नाही अशी स्थिती आहे. त्याची दखल घेत शासनाने संत्रा बागांचे सर्व्हेक्षण व पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी केली आहे.

अमरावतीसोबतच अकोला, वाशीम, बुलडाणा तसेच नागपूर या जिल्ह्यांत देखील संत्रा पिकाखालील क्षेत्र वाढते आहे. या भागातील बागायतदारांना देखील नुकसान सोसावे लागले. त्याची दखल घेत भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत संत्रा लागवड आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे संत्रा बागांचा ताण तुटला. परिणामी मृग बहरात फळधारणा होण्याची शक्‍यता नाही. संत्रा बागेच्या व्यवस्थापनावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने बागायतदारांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
- श्रीधर ठाकरे कार्यकारी संचालक, महाऑरेंज, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com