Farmer Suicide : सरकारचा नाकर्तेपणा! अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्याची उपोषण मंडपातच आत्महत्या

Wardha Dam Project : अमरावतीच्या अप्पर वर्धा धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील २५२ दिवसापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यादरम्यान मोर्शी येथे साखळी उपोषण मंडपात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
Farmer Suicide
Farmer Suicide Agrowon

Pune News : अमरावतीच्या अप्पर वर्धा धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील २५१ दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडून मोर्शी येथे साखळी उपोषण देखील मागील ३ दिवसांपासून सुरू आहे. यादरम्यान येथे उपोषण मंडपातच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला असून येथे तणावाचे वातावरण झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोर्शी याठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. येथे हे आंदोलन गेल्या २५२ दिवसापासून विविध मागण्यांसाठी केले जात आहे. येथेच गेल्या तीन एक दिवसापासून साखळी उपोषण देखील सुरू आहे. याच साखळी उपोषण मंडपात गोपाल दहीवडे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२७ रोजी) सकाळी उघडकीस आली असून गोपाल दहीवडे यांनी आपल्या आत्महत्येला सरकार आणि प्रशासन जबाबदार असल्याचे लिहून ठेवलं आहे. तसेच त्यांनी, 'हा लढा असाच सुरुच ठेवावा', असेही म्हटले आहे. सध्या घटनास्थळावर पोलीस पोहचले असून ते पुढील तपस करत आहेत.

Farmer Suicide
अप्पर वर्धा प्रकल्पात २२ टक्‍के पाणीसाठा

दरम्यान काही काही महिन्यांपूर्वीच गोपाल दहीवडे यांनी याच प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात जाळीवर उडी मारली होती. त्यावेळी त्यांना सरकारने मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनांची पुर्तता सरकारकडून झाली नाही. यामुळे निराश होऊन गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केल्याचे येथे बोलले जात आहे.

जलसमाधी आंदोलन

दरम्यान याच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देत तसा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून तो हाणून पाडला. याचदरम्यान शुक्रवारी (२६ रोजी) मध्यरात्री उपोषण मंडपातच गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

Farmer Suicide
Farmer Death : पांगरीत शेतकऱ्याची आत्महत्या

धरणग्रस्तांच्या मागण्या

धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी

सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना २५ ते ३० लाख रक्कम देण्यात यावी

धरणग्रस्तांच्या मागण्या

ही रक्कम फरक आणि व्याजासहित देण्यात यावी

जे प्रकल्पग्रस्त शेतकरी अजूनही प्रमाणपत्रापासून वंचित आहेत त्यांनी तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावीत

ज्यांना मोबदला मिळालेला नाही, त्यांना सध्याच्या बाजारभावानुसार अनुदान देण्यात यावे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com