.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Akola News : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अकोट तालुक्यातील शेती सततच्या पावसामुळे यंदा अडचणीत सापडली आहे. शेतातील पिके पिवळे होऊन त्याची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी अधिक पावसामुळे पिके जळाल्याचेही दिसून येत आहे. संपूर्ण अकोट तालुक्यात सर्वच मंडलांमध्ये ही परिस्थिती बनलेली आहे.
या वर्षी गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने खरीप पिकांची स्थिती बिकट बनली आहे. अकोलखेड, पणज, उमरा या मंडलांमध्ये बारमाही ओलिताची सोय असून संत्रा, केळी, लिंबू यासारखी पिके शेतकरी घेतात. अतिपावसामुळे, अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे फळझाडांवर विपरीत परिणाम झाला. पान, फळ गळती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याचा फटका उत्पादनावर झाला. पर्यायाने शेतकऱ्यांचे अर्थकारण अडचणीत सापडले आहेत.
या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली दिसत आहेत. तर काही ठिकाणी शेतातून पाण्याचे पाट वाहले. यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी अकोलखेड, पणज आणि उमरा महसूल मंडलांतील शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, कृषी, महसूल विभागाकडे निवेदने दिली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.