Agriculture Department : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभाग सज्ज, ऊस, सोयाबीन, भुईमूग पिकांचे असे करा संरक्षण

Agriculture Department kolhapur : प्राथमिक अवस्थेत बंदोबस्त व्हावा, यासाठी उपाययोजना सुरू आहेत. हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने धडाका लावला आहे.
Agriculture Department
Agriculture Departmentagrowon

Kolhapur Agriculture Department : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा वळीव पावसाने साथ दिल्याने खरिप हंगामाच्या लगबगीला शेतकरी लागला आहे. खरिप हंगामपूर्व कामाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. या हंगामात हुमणी अळीचा मोठा प्रादूर्भाव होत असल्याने नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग प्रबोधन करू लागला आहे.

मागील सात-आठ वर्षांत हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तीस ते चाळीस टक्के उत्पादन घटले. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत बंदोबस्त व्हावा, यासाठी उपाययोजना सुरू आहेत. हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने धडाका लावला आहे.

मे महिन्यात ठिकठिकाणी सर्व ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस झाला. असा पाऊस झाला की, जमिनीतील भुंगे सूर्यास्तानंतर बाहेर पडतात. बाभूळ, कडुनिंब, बोर, करंज, धामण, शेवगा झाडावर पाने खाण्यासाठी बसतात. या भुंग्यापासूनच पुढे जमिनीत हुमणीची अळी तयार होते. भुंगे हे गडद तपकिरी रंगाचे असतात. तर अळी ही गडद तपकिरी तोंड असलेली पांढऱ्या रंगाची सी आकाराची असते.

याचा प्रादुर्भाव हळूहळू दिसून येतो. अंडी मोठ्या प्रमाणात जमिनीत घालतात. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव झपाट्याने विस्तारतो. मुळातच मे-जून महिन्यातच निर्मितीच्या अगोदर प्राथमिक टप्प्यात हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य होते. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Agriculture Department
Kharip Season Kolhapur : खरीप हंगामासाठी कोल्हापूर जिल्हा सज्ज, खतांचा साठा भात, सोयाबीनसह इतर बियाणे उपलब्ध

खरीप हंगामाच्या तयारीबरोबरच नियंत्रणासाठी प्रबोधन, प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविली जात आहेत. जिथे मोटार पंप आहेत तिथे प्रकाश सापळे लावावेत, असे आवाहन कृषी विभाग करीत आहे. सापळा लावण्यासाठी पाच बाय चार आकाराचा १ फूट खोल खड्डा काढावा. पिवळा प्लास्टिकचा कागद लावून त्यावर १०० वॅट बल्ब लावावा. सायंकाळी सहा ते आठ वेळेत सापळा लावावा. या प्रकाशाकडे भुंगे आकर्षित होतात. ती नष्ट करता येतात. त्यामुळे हुमणी अळीचा बंदोबस्त तसेच नियंत्रण करता येते.

भुदरगड तालुक्याचे कृषी अधिकारी किरण पाटील म्हणाले की, हुमणी अळी समूळ नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रकाश सापळे तयार करून हुमणीचा नायनाट करता येतो. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

असे थांबवा नुकसान

मॉन्सूनमध्ये अळीचा शिरकाव मादी भुंगा जवळच्या क्षेत्रावरच ६० ते ७० अंडी घालते. यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते. या अळीची तिसरी अवस्था प्रामुख्याने ऊस, भात, भुईमूग पिकाची मुळे खाते व पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com